शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

३० वर्षांनंतर आदिवासी शेतकऱ्याला मिळाला न्याय

By admin | Updated: August 7, 2015 01:58 IST

शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली.

महाराष्ट्र महसूल प्राधिकरण व तहसीलकडून मिळाली १६ एकर जमीन परतकारंजा (घाडगे): शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली. यावर शेतकऱ्याच्या मुलाने शेतीचा ताबा मिळविण्याकरिता तहसीलदार व महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे धाव घेतली. यावर निर्णय देत सदर शेती शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयानुसार अखेर ३० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्तात त्याच्या जमिनीचा ताबा देण्यात आला.या बाबत थोडक्यात वृत्त असे की, फेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम (७५) यांची ब्राम्हणवाडा शिवारात १६.९४ एकर शेती होती. ही शेती याच गावातील सोमा इंगळे, भीमराव तेलमोरे, जीजा तेलमोरे, वेणूबाई दाभणे या चार गैरआदिवासी शेतकऱ्यांनी, शासनाची पूर्व परवानगी न काढता विकत घेतली होती. ही जमीन परत मिळावी म्हणून देविदास श्रीरामे यांनी कारंजा तहसीलला अर्ज केला होता. या विरोधात, गैरअर्जदार महाराष्ट्र प्राधिकरण नागपूरकडे अपीलात गेले. तेव्हा महासूल प्राधिकरणाने तहसीलच्या निकालाला स्थगनादेश देवून तहसीलदारांना फेर चौकशीचे आदेश दिले. कारंजा तहसीलदारांनी आदिवासी शेतकरी श्रीराम यांना शेती परत मिळण्यात यावी, अशी शिफारस केली. त्या शिफारसीनुसार प्राधिकरणाने स्थगनादेश हटवून जमीन मुळ आदिवासी शेतकरी देविदास श्रीराम यांना परत देण्यात यावी, असा आदेश काढून प्रकरण निकाली काढले, त्या आदेशानुसार १७ जुलैला श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला.आदिवासीची जमीन विशेष परवानगी काढल्या शिवाय, कुणालाही विकत घेता येत नाही. असे असताना हा व्यवहार झाला होेता. तब्बल तीस वर्षानंतर या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन परत देण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाद्वारे देण्यात आला. त्यानुसार तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार गणेश बर्वे, कातोरे आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात मुळ मालक देवीदास श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला. तीस वर्षानंतर का होईना, न्याय मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)परवानगी नसताना झाला शेती विक्रीचा व्यवहारफेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम यांची मौजा ब्राम्हणवाडा येथील १६.९४ एकर जमीन येथील चार गैरआदिवासींनी कोणतीही पूर्व परवानगी न काढता ३० वर्षांपूर्वी विकत घेतली होती. हा व्यवहार अंधारात ठेवत झाल्याची तक्रार सदर शेतकऱ्याच्या मुलाने तहसीलदारांसह महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे केली. यावर चौकशी होवून शेती सदर शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. यानुसार पोलीस बंदोबस्तात ही शेती मुळ शेतकऱ्याना परत करण्यात आली.