शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

३० वर्षांनंतर आदिवासी शेतकऱ्याला मिळाला न्याय

By admin | Updated: August 7, 2015 01:58 IST

शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली.

महाराष्ट्र महसूल प्राधिकरण व तहसीलकडून मिळाली १६ एकर जमीन परतकारंजा (घाडगे): शासनाने आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दिलेल्या जमिनीची दुसऱ्याला विक्री करता येत नसताना तालुक्यातील फेफरवाडा येथे शेतीची विक्री झाली. यावर शेतकऱ्याच्या मुलाने शेतीचा ताबा मिळविण्याकरिता तहसीलदार व महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे धाव घेतली. यावर निर्णय देत सदर शेती शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयानुसार अखेर ३० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्याला पोलीस बंदोबस्तात त्याच्या जमिनीचा ताबा देण्यात आला.या बाबत थोडक्यात वृत्त असे की, फेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम (७५) यांची ब्राम्हणवाडा शिवारात १६.९४ एकर शेती होती. ही शेती याच गावातील सोमा इंगळे, भीमराव तेलमोरे, जीजा तेलमोरे, वेणूबाई दाभणे या चार गैरआदिवासी शेतकऱ्यांनी, शासनाची पूर्व परवानगी न काढता विकत घेतली होती. ही जमीन परत मिळावी म्हणून देविदास श्रीरामे यांनी कारंजा तहसीलला अर्ज केला होता. या विरोधात, गैरअर्जदार महाराष्ट्र प्राधिकरण नागपूरकडे अपीलात गेले. तेव्हा महासूल प्राधिकरणाने तहसीलच्या निकालाला स्थगनादेश देवून तहसीलदारांना फेर चौकशीचे आदेश दिले. कारंजा तहसीलदारांनी आदिवासी शेतकरी श्रीराम यांना शेती परत मिळण्यात यावी, अशी शिफारस केली. त्या शिफारसीनुसार प्राधिकरणाने स्थगनादेश हटवून जमीन मुळ आदिवासी शेतकरी देविदास श्रीराम यांना परत देण्यात यावी, असा आदेश काढून प्रकरण निकाली काढले, त्या आदेशानुसार १७ जुलैला श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला.आदिवासीची जमीन विशेष परवानगी काढल्या शिवाय, कुणालाही विकत घेता येत नाही. असे असताना हा व्यवहार झाला होेता. तब्बल तीस वर्षानंतर या आदिवासी शेतकऱ्यांची जमीन परत देण्यात यावी, असा आदेश महाराष्ट्र महसूल प्राधिकरणाद्वारे देण्यात आला. त्यानुसार तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार गणेश बर्वे, कातोरे आणि तलाठी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात मुळ मालक देवीदास श्रीराम यांना जमिनीचा ताबा देण्यात आला. तीस वर्षानंतर का होईना, न्याय मिळाला आहे.(तालुका प्रतिनिधी)परवानगी नसताना झाला शेती विक्रीचा व्यवहारफेफरवाडा येथील आदिवासी शेतकरी देविदास मारोती श्रीराम यांची मौजा ब्राम्हणवाडा येथील १६.९४ एकर जमीन येथील चार गैरआदिवासींनी कोणतीही पूर्व परवानगी न काढता ३० वर्षांपूर्वी विकत घेतली होती. हा व्यवहार अंधारात ठेवत झाल्याची तक्रार सदर शेतकऱ्याच्या मुलाने तहसीलदारांसह महाराष्ट्र महसूल प्राधिकरणकडे केली. यावर चौकशी होवून शेती सदर शेतकऱ्याला परत करण्याचा निर्णय देण्यात आला. यानुसार पोलीस बंदोबस्तात ही शेती मुळ शेतकऱ्याना परत करण्यात आली.