शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

गोठ्याला लागलेल्या आगीत ३० क्विंटल कापूस स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 22:47 IST

तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देतास येथील घटना : शेतकऱ्याचे दोन लाखांच्या वर नुकसान

ऑनलाईन लोकमतसमुद्रपूर : तालुक्यातील तास येथील साहेबराव धोटे यांच्या घराला अचानक आग लागली. यात गोठ्यातील ३० क्विंटल कापूस जळून भस्मसात झाला. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. यात त्यांचे अंदाचे दोन लाख रुपयांवर नुकसान झाले. नागरिकांच्या सतर्कतेने परिसरात आग पसरली नाही.तास येथील साहेबराव धोटे यांच्याकडे १२ एकर शेती आहे. त्यांनी सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले होते. जवळपास ३० क्विंटल निघालेला कापूस त्यांनी गोठ्यात साठवून ठेवला होता. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोठ्याला अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच प्रफुल उसरे, मनीष नांदे, अनिल सूर्यवंशी, आशीष सूर्यवंशी, नानाजी धोटे, पुंडलिक धोटे, चिंतामण सूर्यवंशी, मधुकर उसरे, पंढरी वैद्य, कवडू कोल्हे, शंकर सुपारे आदी नागरिकांनी गावातील विहिरीवरून मोटार पंप सुरू करून आग विझविण्याचा प्रयत्न केला; पण तोपर्यंत गोठ्यातील ३० क्विंटल कापूस स्वाहा झाला होता. गोठ्यातील शेतीपयोगी साहित्यही जळून खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग परिसरात पसरली नाही.माहिती मिळताच तलाठी ढवळे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याबाबतचा अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे. धोटे कुटुंबीयांचे उदरनिवार्हाचे साधन शेतीच आहे. कष्टाने पिकविलेले कपाशीचे पीक हातचे निघून गेल्याने त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकºयाला शासकीय मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :fireआग