शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

३ हजार ७५ शेतकऱ्यांचे अडकले १९.८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:55 IST

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत.

ठळक मुद्देचिंता वाढली : दीड महिना लोटूनही तुरीचे चुकारे अप्राप्त

ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्ह्यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांचे तब्बल १९ कोटी ८२ लाख १८ हजार ९५२.५० रुपयांचे चुकारे थकले आहेत. शेतकऱ्यांकडून जुन्या हंगामातील अपयशाच्या आठवणी विसरून नव्या हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. यात चुकारे थकल्याने त्यांची चांगलीच अडचण होत आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. या सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करून तूर आणण्याच्या सूचना होत आहेत. नोंद झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल संदेश पाठवून त्यांचा शेतमाल आणण्याबाबत कळविले जाते. या पद्धतीत आतापर्यंत ५ हजार ७६० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहेत. यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ३६ हजार ३७० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.तुरीची खरेदी झाल्यानंतर किमान आठ दिवसांत त्यांना चुकारे मिळणे अपेक्षित आहे; पण जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. नाफेडला तूर देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या संदर्भात मार्केटींग कार्यालयात विचारणा करण्याकरिता शेतकरी जात असून त्यांना अनुदान येताच चुकारे देण्यात येणार असल्यासचे सांगितले जात आहे; पण अनुदान कधी येणार, याची माहिती त्यांना नसल्याचे दिसून येते. शासनाच्या या अनागोंदीमुळे तूर उत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आल्याचे दिसत आहे. शासनाने याकडे लक्ष देत शेतकºयांचे तुरीचे थकित चुकारे त्वरित अदा करणे गरजेचे झाले आहे.शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडेशासनाच्या केंद्रावर तूर देऊन वेळीच रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. शासनाला तूर दिल्यास किमान हमीभाव मिळण्याची आशा आहे; पण रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसते.येत्या दिवसात चण्याची खरेदीशासनाकडून तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रांवर तुरीसोबतच चण्याची खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या केंद्रावर चणा खरेदीची तयारी पूर्ण झाली असून त्याचा मुहूर्त लवकरच साधणार असल्याचे मार्केटींग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. चण्याची खरेदीही आॅनलाईन पद्धतीने तुरीच्या निकषानुसार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या शासकीय खरेदीकडे शासनाची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या आॅनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.येत्या चार-पाच दिवसांत चण्याची खरेदी सुरू होणार आहे. शेतकºयांनी केंद्रावर जाऊन आपली आॅनलाईन नोंदणी करण्याची गरज आहे. चणा खरेदीत शेतकऱ्यांकडून शासनाच्या केंद्राला पाठ दाखविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे चुकारे अडले असल्याचे सध्या वास्तव आहे. शेतकऱ्यांना चुकारे देण्याकरिता शासनाकडून लवकरच अनुदान मिळणार असून ते येताच तुरीचे चुकारे देण्यात येणार आहे.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.