शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

३ हजार ७५ शेतकऱ्यांचे अडकले १९.८२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:55 IST

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत.

ठळक मुद्देचिंता वाढली : दीड महिना लोटूनही तुरीचे चुकारे अप्राप्त

ऑनलाईन लोकमतवर्धा : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या अडचणी संपता संपत नसल्याचे दिसते. मोठ्या अडचणींवर मात करून तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांना दीड महिन्याचा कालावधी लोटूनही तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्ह्यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांचे तब्बल १९ कोटी ८२ लाख १८ हजार ९५२.५० रुपयांचे चुकारे थकले आहेत. शेतकऱ्यांकडून जुन्या हंगामातील अपयशाच्या आठवणी विसरून नव्या हंगामाचा शुभारंभ करण्यात येत आहे. यात चुकारे थकल्याने त्यांची चांगलीच अडचण होत आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या केंद्रांवरून तूर खरेदी सुरू आहे. या सात केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे. शासकीय खरेदी आॅनलाईन पद्धतीने करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करून तूर आणण्याच्या सूचना होत आहेत. नोंद झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल संदेश पाठवून त्यांचा शेतमाल आणण्याबाबत कळविले जाते. या पद्धतीत आतापर्यंत ५ हजार ७६० शेतकऱ्यांकडून नोंदणी करण्यात आली आहेत. यातील ३ हजार ७५ शेतकऱ्यांकडून ३६ हजार ३७० क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे.तुरीची खरेदी झाल्यानंतर किमान आठ दिवसांत त्यांना चुकारे मिळणे अपेक्षित आहे; पण जिल्ह्यात तसे होत नसल्याचे दिसून आले आहे. नाफेडला तूर देऊन दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. जिल्ह्यातील एकाही शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या संदर्भात मार्केटींग कार्यालयात विचारणा करण्याकरिता शेतकरी जात असून त्यांना अनुदान येताच चुकारे देण्यात येणार असल्यासचे सांगितले जात आहे; पण अनुदान कधी येणार, याची माहिती त्यांना नसल्याचे दिसून येते. शासनाच्या या अनागोंदीमुळे तूर उत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आल्याचे दिसत आहे. शासनाने याकडे लक्ष देत शेतकºयांचे तुरीचे थकित चुकारे त्वरित अदा करणे गरजेचे झाले आहे.शेतकऱ्यांचा कल व्यापाऱ्यांकडेशासनाच्या केंद्रावर तूर देऊन वेळीच रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. शासनाला तूर दिल्यास किमान हमीभाव मिळण्याची आशा आहे; पण रकमेकरिता प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसते.येत्या दिवसात चण्याची खरेदीशासनाकडून तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रांवर तुरीसोबतच चण्याची खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या केंद्रावर चणा खरेदीची तयारी पूर्ण झाली असून त्याचा मुहूर्त लवकरच साधणार असल्याचे मार्केटींग कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. चण्याची खरेदीही आॅनलाईन पद्धतीने तुरीच्या निकषानुसार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तुरीचे चुकारे थकल्याने चण्याच्या शासकीय खरेदीकडे शासनाची पाठ होत असल्याचे दिसून आले आहे. सध्या आॅनलाईन नोंदणीला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.येत्या चार-पाच दिवसांत चण्याची खरेदी सुरू होणार आहे. शेतकºयांनी केंद्रावर जाऊन आपली आॅनलाईन नोंदणी करण्याची गरज आहे. चणा खरेदीत शेतकऱ्यांकडून शासनाच्या केंद्राला पाठ दाखविण्याचा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे चुकारे अडले असल्याचे सध्या वास्तव आहे. शेतकऱ्यांना चुकारे देण्याकरिता शासनाकडून लवकरच अनुदान मिळणार असून ते येताच तुरीचे चुकारे देण्यात येणार आहे.- व्ही.पी. आपदेव, जिल्हा मार्केटींग अधिकारी, वर्धा.