शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ३ कोटी ६१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांना अखेर ८ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, बँक खात्यात ३ कोटी ६१ लाख ४८८ रुपये जमा करण्यात आले आहेत. आता सेलू येथील तहसीलदारांच्या सूचनेवरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या आदेशान्वये सेलू येथील तहसीलदारांनी २०२१ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली. टालाटुले याचे सिंदी रेल्वे येथील शेत आणि लेआउटचा लिलाव झाला. या लिलावात सरकारला ३ कोटी ६२ लाख रुपये मिळाले आहेत. तहसीलदार, सेलू यांनी बँक ऑफ इंडिया व सहायक निबंधक सहकारी संस्था, सेलू यांना पत्र पाठवून लिलावातून मिळालेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या असून पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

...अन् मोफत चालविला खटला...फसवणूक करणाऱ्या टालाटुले या व्यापाऱ्याविरोधात शेतकऱ्यांना न्यायालयात खटला लढावा लागला. मात्र, शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याने या प्रकरणात ॲड. शंतनू भोयर यांनी शेतकऱ्यांचा हा खटला मोफत लढण्याचा निर्णय घेतला. ४ वर्षे हा खटला लढण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक छदामही त्यांनी घेतला नाही, हे विशेष.

शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचा आदेश आहे. त्यामुळे सुनील टालाटुलेकडून वसूल करण्यात येणारी रक्कम ८ कोटींवरून १२ कोटींवर पोहोचली आहे. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. - रामनारायण पाठक, शेतकरी नेते.

 

टॅग्स :Farmerशेतकरी