शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

४१४ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ३ कोटी ६१ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांना अखेर ८ वर्षांनंतर न्याय मिळाला असून, बँक खात्यात ३ कोटी ६१ लाख ४८८ रुपये जमा करण्यात आले आहेत. आता सेलू येथील तहसीलदारांच्या सूचनेवरून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्या नेतृत्वात त्रस्त शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. २०१८ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. या आदेशान्वये सेलू येथील तहसीलदारांनी २०२१ मध्ये व्यापारी टालाटुले याच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची प्रक्रिया राबविली. टालाटुले याचे सिंदी रेल्वे येथील शेत आणि लेआउटचा लिलाव झाला. या लिलावात सरकारला ३ कोटी ६२ लाख रुपये मिळाले आहेत. तहसीलदार, सेलू यांनी बँक ऑफ इंडिया व सहायक निबंधक सहकारी संस्था, सेलू यांना पत्र पाठवून लिलावातून मिळालेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना दिल्या असून पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

...अन् मोफत चालविला खटला...फसवणूक करणाऱ्या टालाटुले या व्यापाऱ्याविरोधात शेतकऱ्यांना न्यायालयात खटला लढावा लागला. मात्र, शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याने या प्रकरणात ॲड. शंतनू भोयर यांनी शेतकऱ्यांचा हा खटला मोफत लढण्याचा निर्णय घेतला. ४ वर्षे हा खटला लढण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक छदामही त्यांनी घेतला नाही, हे विशेष.

शेतकऱ्यांना १२ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचा आदेश आहे. त्यामुळे सुनील टालाटुलेकडून वसूल करण्यात येणारी रक्कम ८ कोटींवरून १२ कोटींवर पोहोचली आहे. उर्वरित रक्कम मिळण्यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार आहोत. - रामनारायण पाठक, शेतकरी नेते.

 

टॅग्स :Farmerशेतकरी