शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

२८६ गावांना पाणीटंचाईची झळ

By admin | Updated: February 1, 2016 01:59 IST

उन्हाळा आला की जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते. जानेवारी अखेरच जिल्ह्यात यंदा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे.

उन्हाळ्याची चाहूल : जिल्ह्यात ४७८ उपाययोजनांवर ८ कोटी रुपयांचा खर्च रूपेश खैरी वर्धा उन्हाळा आला की जिल्ह्यात पाणीटंचाई डोके वर काढते. जानेवारी अखेरच जिल्ह्यात यंदा पारा ३५ अंशावर पोहोचला आहे. शिवाय यंदाच्या अल्प पावसामुळे विहिरींची पातळीही वाढण्यास विशेष मदत झाली नाही. यामुळे जिल्ह्यात या उन्हाळ्यात २८६ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. या गावात नागरिकांना पाण्याच्या दुर्भिक्षाचा सामना करावा लागणार असल्याने शासनाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. टंचाईसदृश्य गावांत एकूण ४७८ योजना राबविण्यात येणार आहे. यावर जिल्हा परिषदेच्यावतीने ७ कोटी ९८ लाख ४५ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. या जिल्हाधिकाऱ्यांकडून या अपेक्षित खर्चाला हिरवी झेंडी मिळाली आहे. यामुळे पाणीटंचाईचे सावट असलेल्या या गावात उपाययोजना राबविण्याच्या कामांना प्रारंभ झाल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात पाण्याची पातळी टिकविण्याकरिता मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. त्यातून बऱ्याच गावात बंधारे बांधत पाणी अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. असे असतानाही जिल्ह्यातील निम्म्या गावात पाणीटंचाई असल्याचे जिल्हा परिषदेच्या आराखड्यातून दिसते आहे. यावर करण्यात येत असलेला खर्च प्रत्येक उन्हाळ्यात राबविण्यात येत असलेल्या आराखड्यापेक्षा अधिक असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे. या निधीतून नागरिकांकरिता कायमस्वरूपी योजना आखण्याचा प्रयत्न असल्याचेही विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. असे असले तरी दर वर्षाला उन्हाळा येताच पाणीटंचाई डोके वर काढत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. हे चित्र बदलविण्याची मागणी आहे. पाण्याकरिता चामलावासीयांना दोन किमीचा फेराआष्टी (शहीद) : तालुक्यातील डोंगर माथ्यावर असलेल्या चामला गावात गत २५ वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. हे गाव रेड झोनमध्ये आले आहे. पाण्याची गरज भागविण्याकरिता गावकऱ्यांना २ किमीचा फेरा सहन करावा लागत आहे. या गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. या पाणीटंचाईमुळे त्यांच्या व्यवसायावर चांगलाच प्रभाव झाला आहे. ४०० लोकसंख्या असलेल्या या गावात मोजक्याच विहिरी आहेत. त्यांची पातळीही खालावली आहे. ही स्थिती प्रत्येक वर्षाची असताना शासनाकडून येथे अद्यापही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. येथे नागरिकांसह जनावरांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. या गावात राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पाणी पुरवठ्याचे काम मंजूर झाल्याची माहिती आहे; मात्र त्याचेही भिजत धोंगडे दिसते आहे. शासनाने अशा गावांना विशेष बाब म्हणून प्राधान्य देणे आवश्यक आहे. टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात आली. त्याकडेही पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसते. ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग कारंजा येथे गावकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र या कार्यालयात उपविभागीय अभियंता सतत गैरहजर असल्याने नागरिक हतबल झाले आहेत. यावर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी तुळशीराम बिटणे, सुरचंद धुर्वे, वसंता बिटणे यांनी वरिष्ठांकडे केली आहे. सद्या मंगेश घाटोळे यांच्या विहिरीवरून बैलबंडीने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यासाठी सकाळपासून कसरत करावी लागत आहे.