शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

वर्धेत २८६ नकाशेच मंजूर

By admin | Updated: April 29, 2016 02:00 IST

अवैध बांधकामांचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. शासन, प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता इमले चढविले गेले.

न्यायालयाच्या आदेशाने भंबेरी : अवैध बांधकाम धोक्यात वर्धा : अवैध बांधकामांचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. शासन, प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता इमले चढविले गेले. आता ते नियमित करण्याकरिता शासनावर दबाव वाढत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामे नियमित करण्यास नकार दिला. यामुळे वर्धेतील अवैध बांधकामांवरही गंडांतर आले आहे. शहरात तीन वर्षांत केवळ २८६ नकाशांनाच मंजुरी देण्यात आली. यामुळे बहुतांश इमारती अवैध ठरत आहे. आता यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांबाबत आदेश जारी केला. यात महानगर पालिका, नगर पालिका क्षेत्रातील अवैध बांधकामे नियमित करू नये, असे नमूद केले आहे. यामुळे इमल्यांवर इमले चढविलेल्या धनिकांचे धाबे दणाणले आहे. नागरिकांना रितसर परवानगी घेऊनच बांधकाम करावयाचे असते; पण पालिका प्रशासन मंजुरी अर्ज व नकाशांमध्ये त्रुट्या काढून त्रास देते. परिणामी, अवैध बांधकामांमध्ये वाढ होत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे. एकट्या वर्धा शहरात वर्षभरात किमान ४०० ते ५०० बांधकामांचे अर्ज, नकाशे मंजुरीकरिता येतात. यातील काहीच नकाशांना मंजुरी दिली जाते. यामुळे उर्वरित नागरिक अवैध बांधकाम करून मोकळे होतात. यात पालिका प्रशासनाचेच नुकसान होत आहे. पालिकेला पाच कोटी रुपयांचा महसूलपालिकेच्या बांधकाम विभागाने २०१३-१४ मध्ये ७९ नकाशे मंजूर केले. यात ३३ लाख ११ हजार ५२४ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१४-१५ मध्ये ९१ नकाशांच्या मंजुरीतून ५३ लाख ७५ हजार १२६ रुपये प्राप्त झाले. २०१५-१६ मध्ये पालिकेने ११६ नकाशातून ४ कोटी ९६ लाख ५५२ रुपये महसूल मिळाला. यात शिवाजी चौकातील मॉल, मार्केट व फ्लॅटच्या विकास शुल्कापोटीच पालिकेला २ कोटी ७६ लाख रुपयांचा महसून प्राप्त करता आला. तीन वर्षांत पालिकेला सुमारे ५ कोटी ८२ लाख ८७ हजार रुपयांचा महसूल प्राप्त झाला.कोट्यवधीच्या महसुलावर पाणीपालिकेच्या बांधकाम विभागाने नियमानुसार बांधकामांना परवानगी दिली तर प्रत्येक वर्षी आठ ते दहा कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होऊ शकतो; पण वर्धा नगर परिषदेकडून एकाच अर्जामध्ये सातवेळा त्रुट्या काढल्या जात असल्याने अवैध बांधकामांचा पसारा वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बांधकामांना रितसर परवानगी देत महसुलामध्ये भर घालणे गरजेचे आहे.न्यायालयाच्या निर्णयामुळे घबराटमुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामांना नियमित करण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लावला आहे. अवैध बांधकामे कुठल्याही स्थितीत नियमित करू नये, असे आदेश दिल्याने धनिकांमध्ये घबराट पसरली आहे. आता या बांधकामांवर कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पालिका प्रशासनाशी चर्चामुंबई उच्च न्यायालयाने अवैध बांधकामे नियमित न करण्याचे आदेश जारी केले. यामुळे शहरातील बहुतांश इमारती अवैध ठरत आहेत. आता या इमारतींचे काय होणार, हा प्रश्नच आहे. शिवाय पालिकेने बांधकामांना रितसर परवानगी दिल्यास शहर विकासाकरिता निधी उपलब्ध होऊ शकतो. याबाबत ताराचंद चौबे यांनी न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, खोराटे, सुनंदा धावरे यांच्याशी चर्चा केली. नियमानुसार एक महिन्याच्या आत बांधकामाची परवानगी देत अवैध बांधकामांवर आळा घालावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.