शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

२८४ ग्रामपंचायतींची वीज कापणार

By admin | Updated: March 10, 2016 02:44 IST

जिल्ह्यातील अनेक ग्रा.पं.ची वीज देयके थकली आहेत. हा आकडा सद्यस्थितीत ४ कोटी ४९ लाख रुपयांवर पोहोचला आहे.

चार कोटींची देयके थकली : उत्पन्न कमी असलेल्या ग्रामपंचायतींची कोंडीप्रशांत हेलोंडे वर्धाजिल्ह्यातील अनेक ग्रा.पं.ची वीज देयके थकली आहेत. हा आकडा सद्यस्थितीत ४ कोटी ४९ लाख रुपयांवर पोहोचला आहे. मार्च एंडींग असल्याने महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. यात जिल्ह्यातील २८४ ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्रामीण भागात काळोखासह पाणीटंचाई गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाबत्ती, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन यासह अन्य सुविधा पुरविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण नागरिकांना सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर सोपविली आहे. उत्पन्नाची बऱ्यापैकी साधने उपलब्ध असलेल्या ग्रा.पं. प्रशासनाला ग्रामस्थांना सुविधा पुरविणे सोईचे होते; पण लहान व उत्पन्नाचे विशेष स्त्रोत नसलेल्या ग्रा.पं. प्रशासनाला कर वसुलीवरच अवलंबून राहावे लागते. गावांत दिवाबत्ती, पाणी पुरवठा यासाठी महावितरणने वीज जोडणी दिली. आहे. स्वतंत्र फीडरची व्यवस्थाही करून देण्यात आली. दिवाबत्ती व पाणी पुरवठ्यासाठी लागणाऱ्या विजेचे देयक ग्रा.पं. प्रशासनाला अदा करावे लागते; पण दोन वर्षांपासून दुष्काळ, नापिकीमुळे गावांतील कर वसुलीवर गंडांतर आले. न्यायालयानेही ग्रामीण भागातील घर कर वसुलीला स्थगिती दिली. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाची पुरती गोची झाली आहे. गावातील घर कर वसूल करता येत नाही आणि पाणी पट्टी कराची वसुलीही जेमतेम ४० टक्केच होत असल्याने विजेची देयके प्रलंबित राहिली आहेत. जिल्ह्यातील २८४ ग्रा.पं. कडे सुमारे ४ कोटी ४९ लाख रुपये विद्युत देयक थकले आहे. परिणामी, या ग्रामपंचायतींना वीज कपातीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.महावितरणने मार्च एंडीगचे टार्गेट समोर ठेवून वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका सुरू केला आहे. यामुळे ग्रामीण नागरिकांना पाणीटंचाई व काळोखाचा सामना करावा लागण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात निर्माण होऊ घातलेली पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने मध्यस्थी करणे गरजेचे आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २८४ ग्रा.पं.वर वीज कपातीचे गंडांतर येणार असल्याने वीज कंपनीने गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. यात काय निर्णय होतो, याकडे ग्रामपंचायतींचे लक्ष लागले आहे.देयकाचे हप्ते पाडून देण्यासही नकारग्रामपंचायत प्रशासनाकडे उत्पन्नाचे विशेष स्त्रोत नसल्याने मोठ्या रकमेचे देयक एकमुस्त अदा करणे शक्य नाही. परिणामी ग्रा.पं. प्रशासनाकडून देयक भरण्यासाठी टप्पे पाडून देण्याची मागणी करण्यात येत आहे; पण ही मागणी धुडकावत महावितरणकडून वसुलीची धडक मोहीम राबविली जात आहे. यामुळे ग्रा.पं. प्रशासनाची गोची झाली आहे. शासन, प्रशासनाने यात मध्यस्थी करीत वीज देयकाचे हप्ते पाडून द्यावे आणि देयक अदा करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतींकडून केली जात आहे. वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यास ऐन उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर अनेक गावांत पाणी टंचाई उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न होत असताना कृत्रिम संकट ओढवण्याची शक्यता आहे. तालुकानिहाय २८४ ग्रामपंचायतीजिल्ह्यातील एकूण २८४ ग्रामपंचातींचा वीज पुरवठा देयके प्रलंबित राहिल्याने खंडित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यात आर्वी तालुक्यातील ६०, आष्टी ४०, कारंजा ३५, देवळी २२, सेलू १६, वर्धा ४६, हिंगणघाट ३७ आणि समुद्रपूर तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.