शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

२७.८४ कोटींचा अतिरिक्त निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या वर्ष २०२०-२१ च्या प्रारुप आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांनी सादर केलेल्या आराखड्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ११०.७६ कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ग्रामीण विकास हा प्राधान्याचा विषय असल्याने या आराखड्यात २७.८४ कोटींची वाढ करुन एकूण १३८.६० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअजित पवार : सेवाग्राम विकास आराखड्यातील ९५ कोटींना मंजुरी देणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी १३८.६० कोटींच्या वर्धा जिल्हा नियोजन आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. शासनाने ११०.७६ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित करुन दिली होती. पण, मंगळवारी झालेल्या बैठकीत गांधी जिल्ह्यासाठी २७.८४ कोटींच्या अतिरिक्त वाढीव निधीला अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना हा शासनाचा प्राधान्याचा कार्यक्रम असून शेतकऱ्यांना मदत करणे सरकारचे प्रथम कर्तव्य असल्याचे याप्रसंगी ना. अजित पवार यांनी स्पष्ट केले.विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथील सभागृहात अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेत नियोजन समितीची राज्यस्तरीय बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, खा. रामदास तडस, विकास महात्मे, आ. रणजित कांबळे, दादाराव केचे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओम्बासे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभुर्णे आदींची उपस्थिती होती.बैठकीत वर्धा जिल्ह्याच्या वर्ष २०२०-२१ च्या प्रारुप आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. जिल्हा नियोजन समिती वर्धा यांनी सादर केलेल्या आराखड्यावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ११०.७६ कोटींची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र, ग्रामीण विकास हा प्राधान्याचा विषय असल्याने या आराखड्यात २७.८४ कोटींची वाढ करुन एकूण १३८.६० कोटींचा आराखडा मंजूर करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) वर्ष २०२०-२१ साठी मोठ्या ग्रा.पं. मध्ये नागरी सुविधा, अंगणवाडी इमारती, शाळा वर्गखोली बांधकाम, यात्रा स्थळांचा विकास, यशोदा नदी पुनरूज्जीवन, पूर नियंत्रण या योजनांना अतिरिक्त निधी देण्याची मागणी पालकमंत्री सुनील केदार आणि आ. रणजित कांबळे यांनी केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत अर्थमंत्र्यांनी २७.८४ कोटींची वाढ नियमित आराखड्यात करून दिली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष देशभर साजरे होत आहे. वर्धा ही महात्मा गांधींची कर्मभूमी असल्यामुळे या जिल्ह्यात देश-विदेशातील अनेक पर्यटक भेट देत आहेत. त्यामुळे वर्धा आणि सेवाग्रामच्या विकासासाठी शासनाने सेवाग्राम विकास आराखड्यात अनेक विकास कामे हाती घेतली. यामधील प्रलंबित असलेल्या दुसºया टप्प्यातील कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. त्यासाठी ९५ कोटींचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात येईल, असेही ना. पवार म्हणाले.अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणारजिल्हा नियोजन आराखड्यासाठी शासनाने लोकसंख्या आणि क्षेत्रफळानुसार नियतव्ययाची मर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्यांच्या क्षेत्रातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकास कामांचा प्रस्ताव माझ्याकडे सादर करावा. त्यासाठी अर्थसंकल्पातून वेगळा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही याप्रसंगी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSewagramसेवाग्राम