शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे २७२ कर्मचारी होणार स्थायी

By admin | Updated: July 8, 2016 02:06 IST

नगरपरिषदेच्या अस्थाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय मुख्यमत्र्यांनी जाहीर केला आहे.

समीर कुणावार यांची माहिती : ग्रामीण उद्योगातील कामगारांना विमा हिंगणघाट : नगरपरिषदेच्या अस्थाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय मुख्यमत्र्यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळे हिंगणघाट येथील २७२ कर्मचाऱ्यांना स्थाई करण्यात येणार आहे. याबाबत येथील कर्मचाऱ्यांनी आ. समीर कुणावार यांच्या मार्गदर्शनात लढा उभारला होता. तसेच २० जिल्ह्यातील ग्रामीण उद्योगातील लाखो कामगारांना विमा योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्य शासनाने घेतल्याचे यावेळी आमदार समीर कुणावर म्हणाले. राज्य शासनाने राज्यातील एकूण १३८ नगर परिषद पंचायतीमध्ये आकृतीबंधाने पदनिर्मितीचा निर्णय घेतला असून यामध्ये राज्यातील पालिकांमधील अतिरिक्त ठरलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यांना तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरपंचायतीच्या नवीन आकृतीबंधानुसार राज्यात २ हजार ३६८ कर्मचारी पदनिर्मिती होणार असून यात हिंगणघाट नगरपरिषदेतील २७२ अस्थायी कर्मचाऱ्यांसह राज्यातील अन्य नगरपरिषदांमधील १ हजार ३१५ अस्थायी व अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार आहे. स्थानिक नगरपरिषदेत १९९० पासून आकृतीबंधामुळे सद्यस्थितीत अतिरिक्त ठरणाऱ्या २७२ कर्मचाऱ्यांची समस्या कित्येकदा अनेक वर्षांपासून शासन स्तरावर मांडण्यात येत होती. या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा दरवर्षी ३ कोटी रुपये अस्थापनाचा खर्च नगपरिषदेवर व पर्यायाने नागरिकांवर पडून कर्मचारी सुध्दा आर्थिक संकटात सापडले होते. अशा स्थितीत या कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यासाठी न.पा. कर्मचारी संघटनेच्या पुढाऱ्यांनी आ. कुणावार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवून या कर्मचाऱ्याची समस्या मांडली व राज्यातील नगरपंचायतीच्या आकृतीबंद पदनिर्मितीत या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्याची आ. समीर कुणावार यांची कल्पना मुख्यमंत्री अर्थमंत्र्यासह सर्वांनी उचलून धरली. त्यामुळेच हा निर्णय झाल्याचे कर्मचारी बोलत आहेत. नगर पंचायतींना मिळणार अनुभवी कर्मचारीहिंगणघाट : शासनाच्या निर्णयामुळे नगर पंचायतींना अनुभवी कर्मचारी मिळणार असून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत सामावून घेतले जाणार आहे. स्थानिक नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश आडेपवार यांनी याबाबत मनोगत व्यक्त करताना आ. समीर कुणावार यांच्या प्रयत्नातून शासनाने पवित्र रमजान ईदच्या पर्यावर ईदी दिल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले. यावेळी न.प. चे शशिकांत बोकडे, नरेंद्र पिंपळशेंडे, प्रकाश लंके, रफीक आदीसह न.प. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. समीर कुणावार यांनी आयोजित पत्रपरिषदेत माहिती देताना राज्य शासनाने ग्रामीण उद्योगातील कर्मचाऱ्यासाठी घेतलेल्या विमा योजनेची माहितीही दिली. शासन निर्णयानुसार हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील जवळपास १५ हजार कर्मचाऱ्यांना कर्मचारी विमा योजनेचा लाभ मिळणार असून या कर्मचाऱ्यांसोबतच राज्यातील २० जिल्ह्यातील लाखो कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यातील ग्रामीण कापड उद्योगातील कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा, अशी मागणी आ. समीर कुणावार यांच्यामार्फत वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघाच्यावतीने राज्य शासनाकडे लावून धरली होती. या कामगार विमा योजनेंतर्गत ई.एस.आय. च्या रुग्णालयात ग्रामीण उद्योगानमार्फत उपचार होणार असून आजाराचे दरम्यान सुटीचे अर्ध वेतनास पात्र राहणार आहे. सोबतच महिलांना बाळंतपणासाठी मोफत औषधोपचार, सुट्या, मृत कामगारांना अंत्याविधीचा खर्च आदी सोयी मिळणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार असल्याचे आ. कुणावार यांनी सांगितले. या पत्रपरिषदेला वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघाचे मिलिंद देशपांडे, माजी न.प. उपाध्यक्ष प्रेम बसंतानी, सुभाष कुंटेवार, पांडुरंग बालपांडे, दामोधर देशमुख, जयंत बावणे, प्रशांत शेळके, दिवाकर बरबटकार, विलास हिवंज, देवेंद्र हिवरकर, नगरसेवक विठ्ठल गुळघाने, नगरसेविका निता धोबे, शुभांगी डोंगरे, शारदा पटेल आदींसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)