शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यात डेंग्यूचे २७१ रुग्ण

By admin | Updated: November 9, 2014 23:16 IST

जिल्ह्यातच नाही तर राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. यात वर्धा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १ हजार ५९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २७१ जणांना डेंग्यूने ग्रासल्याचे

जनजागृतीसाठी विशेष मोहीम : गावागावात नागरिकांना देणार माहितीवर्धा : जिल्ह्यातच नाही तर राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. यात वर्धा जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत १ हजार ५९६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी २७१ जणांना डेंग्यूने ग्रासल्याचे समोर आले आहे. या आजारापासून जिल्ह्यातील नागरिकांची मुक्तता करावा याकरिता जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्या; मात्र त्या कुठेतरी कमी पडत असून त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.अस्वच्छतेतून हा रोग उद्भवत असून केवळ आरोग्य विभागाच्यावतीने उपाययोजना करून या रोगावर आळा बसणे शक्य नाही. यामुळे नागरिकांना यात सहभागी करण्याची मोहीम आरोग्य विभागाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. यात शाळा महाविद्यालये व गावकऱ्यांचा सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात गावागावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दिवाळीच्या पूर्वी शाळाशाळांत कोरडा दिवस पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. हिच मोहीम पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ही मोहीम १० नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ती १५ दिवस सुरू राहणार आहे. यात गावागावात जावून या रोगावर आळा बसविण्याकरिता जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन करण्यात येत आहे. शहरी भागात आता खासगी रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांनी शासकीय यंत्रणेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावतीने शहरी भागात असलेल्या झोपडपट्टीत नागरिकांना माहिती देण्याकरिता कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)