शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

२६ हजार ग्राहकांना मिळेल अखंडित वीज पुरवठा

By admin | Updated: May 20, 2017 02:11 IST

कारंजा तालुक्याचा वाढता विस्तार पाहता वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

नागरिकांना दिलासा : २२० के.व्ही.चे वीज वितरण केंद्र लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : कारंजा तालुक्याचा वाढता विस्तार पाहता वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने ग्राहकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे कारंजा येथे १२३ के.व्ही.चे विद्युत केंद्र देण्याची खासदार रामदास तडस यांच्याकडे मागणी माजी आमदार दादाराव केचे यांनी केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली असून येथे २२० के.व्ही.चे वीज केंद्र होणार आहे. राज्याचे उर्जा मंत्री बावणकुळे यांच्याकडे या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात आला. सदर मागणी मान्य करीत कारंजा तालुक्याकरिता १२३ के.व्ही.चे केंद्र उभारण्याचा विचार असताना २२० के.व्ही.चे वीज वितरण केंद्र मंजूर करण्यात आले. त्यामुळे तालुक्यावासींना आता सुरळीत वीजपुरवठा मिळणार असून मागणीपेक्षा जादा वीज मिळणार असल्याने दिलासा व्यक्त करण्यात आला. सदर वीज वितरण केंद्र हेटीकुंडी परिसरात उभारले जाणार आहे. महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरूवात करणार असून तालुक्यात कारंजा, नारा, सावळी, हेटीकुंडी व कन्नमवारग्राम येथे कमी शक्तीची विद्युत केंद्र देण्यार येणार आहे. सध्यस्थितीत येथील पाच केंद्रांना तळेगाव येथून वीज पुरवठा होतो. वीज ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता तळेगाव केंद्रावरुन होणारा वीज पुरवठा कमी पडत होता. त्यामुळे नवीन जोडणी घेताना कित्येक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत. यानंतर ग्राहकांना त्वरीत वीजजोडणी मिळू शकते. वारंवार ब्रेक डाऊन होत असल्याने वीज पुरवठा खंडित होऊन अनेकदा नागरिकांना काळोखात राहावे लागत. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने २०१७ पर्यंत ४५८ कृषीपंपाची जोडणी प्रलंबीत आहे. तसेच ६१ घरगुती, ११ व्यावसायिक तर ५ औद्योगिक जोडणी प्रलंबीत आहे. येथील रोहित्र व जनित्र खराब झाले आहे. वीज तारा जुन्या असल्याने वारा सुटला तरी तारा तुटतात. यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. यासह विविध उपाययोजना करण्याकरिता कारंजा वीज वितरण कार्यालयाचे अभियंता सुधीर वानखेडे यांनी शासनाकडे १२३ केव्हीचे वीज केंद्र देण्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविला होता. मात्र येथील समस्या लक्षात घेऊन १२३ के.व्ही. ऐवजी २२० के.व्ही.चे वीज केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे कारंजावासीयांना अखंडित वीज पुरवठा करण्यातील अडचण दूर झाली आहे. सुरळीत वीज पुरवठ्याची मिळणार हमी कारंजा तालुक्यात ९० गावे असून ६० ग्रामपंचायत आहे. कारंजा नगरपंचायत पकडून तालुक्याची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. सद्यस्थितीत वीज वितरणचे ८ हजार ७ शेतकरी ग्राहक, ७५३ व्यावसायिक ग्राहक, १७ हजार ४२६ घरगुती ग्राहक तर २२९ औद्योगिक ग्राहक असे एकुण २६ हजार ४०९ ग्राहक आहेत. ही संख्या वाढत असल्याने येथे स्वतंत्र वीज केंद्र देण्याची मागणी होती. २२० केव्हीचे वीज वितरण केंद्र मंजूर केल्याने कारंजा एमआयडीसी तसेच सिंदीविहिरी येथे प्रस्तावित असलेल्या मेगाफुड पार्कला या केंद्राचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाला अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होईल.