शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२५० शिक्षकांचा हिशेब प्रलंबित

By admin | Updated: November 19, 2015 02:45 IST

परिभाषित अंशदान योजनेत दरमहा वेतनाच्या १० टक्के कपात केली. याविरूद्ध समितीने मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली.

वर्धा : परिभाषित अंशदान योजनेत दरमहा वेतनाच्या १० टक्के कपात केली. याविरूद्ध समितीने मुंबई खंडपीठात याचिका दाखल केली. यानंतर १९ नोव्हेंबर २०११ रोजी शासन निर्णय काढून संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन व भविष्य निर्वाह निधी योजना लागू केली; पण दरम्यानच्या कालावधीत डीसीपीएस म्हणून कपात केलेली रक्कम अद्याप भविष्य निर्वाह निधीत वर्ग केली नाही. अशा २५० पेक्षा अधिक शिक्षकांच्या सुमारे १ कोटी ६५ लाख रुपयांचा हिशेब देण्यात आला नाही. सदर रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात वर्ग करून कपात तारखेपासूनचे व्याज मिळावे, अशी मागणी समितीने केली आहे.१ नोव्हेंबर ०५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची तीन वर्षे अर्थाताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवेत कायम केले गेले. त्यांच्या वेतनातून डीसीपीएस कपात करणे गरजेचे असताना दुर्लक्ष करण्यात आले. कालांतराने संबंधित शिक्षकांना डीसीपीएस खातेक्रमांक दिला व मूळ वेतन, ग्रेड वेतन आणि महागाई भत्त्याच्या १० टक्के रक्कम कपात करणे सुरू केले; पण प्रत्येक शिक्षकाच्या वेतनातून कपात केलेल्या रक्कमेएवढा हिस्सा शासन अंशदान म्हणून खात्यात जमा करणे व एकत्रित रकमेवर व्याज देणे गरजेचे असताना ते प्रलंबित ठेवले. शिक्षक वगळता अन्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात शासन अंशदान व व्याज नियमित जमा झाले. शिक्षकांच्या वेतनातून कपात रकमांची विवरणपत्रे वा हिशेब अद्याप देण्यात आला नाही. असे सुमारे २८६ शिक्षक आहेत. याबाबत म.रा. प्राथमिक शिक्षक समितीने २०१२ पासून निवेदने देत प्रयत्न सुरू केले. १६ फेब्रुवारी १३ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने यांनी निर्देश दिले. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनीही शीघ्र कार्यवाहीच्या सूचना दिल्या. ७ मार्च रोजी विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांनी घेतलेल्या संघटना सहविचार सभेतही त्वरित कारवाईची ग्वाही दिली; पण अद्याप कारवाई झाली नाही. समितीने १९० शिक्षकांच्या अर्जांसह लोकायुंक्तांकडे तक्रार केली. त्यांनी एक महिन्यात प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश जि.प. प्रशासनास दिले; पण कारवाई थंडबस्त्यात आहे. या उदासीन भूमिकेच्या निषधार्थ व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेचा हिशेब मिळावा म्हणून समितीने बुधवारी लाक्षणिक उपोषण केले. समस्या निकाली न निघाल्यास १५ डिसेंबरपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती विजय कोंबे, नरेश गेडे यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)