शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावांना गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: February 29, 2016 01:35 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सायंकाळच्यावेळी येत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे.

गहू लोळला : सेलूत घरांची पडझड; संत्रा, केळी व पपईच्या बागांचे नुकसान वर्धा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सायंकाळच्यावेळी येत असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. शनिवारी रात्री आलेल्या पावसात जिल्ह्यातील २५ गावांना गारपिटीचा तडाखा बसल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम होता. कारंजा तालुक्यातील सेलगाव (लवने) येथे सायंकाळी पाऊस आला. शनिवारी सेलू तालुक्यातील काही घरांची पडझड झाली तर शेतातील गहू लोळला आहे. या गारपिटीमुळे संत्रा, केळी व पपईच्या बागांना चांगलाच फटका बसला. कृषी विभागाच्यावतीने त्याचा सर्व्हे अद्यापही सुरू असल्याने नुकसानीचा आकडा कळू शकला नाही.गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शेतातील गहू सवंगणीच्या मार्गावर असताना अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवसभर वातावरणात पाऊस येईल, असे कुठलेही संकेत नसताना सायंकाळी अचानक पावसाचे आगमन होते. शुक्रवारी आलेल्या पावसात वर्धा तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. शनिवारी आलेल्या पावसाने सेलू तालुक्याचे चांगलेच नुकसान केले. या भागात प्रारंभी साधारण आलेला पाऊस रात्री चांगलाच बरसला. पावसासह आलेल्या गारपिटीमुळे येथील केळीच्या बागांचे नुकसान झाले तर झडशी भागात पपईच्या बागातील झाले उन्मळून पडली. शिवाय या भागात काही घरांवरील छतही उडाले. जिल्हा परिषद क्षेत्रानुसार एकूण तीन क्षेत्रातील २५ गावांना गारपिटीने चांगलेच झोडपल्याची माहिती आहे. यात वर्धा विभागातील दोन गावे, आंजी(मोठी) १९ तर सेलू भागातील चार गावांचा समावेश आहे. पावसासह असलेला वारा व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान करून ेगेला. येत्या दहा दिवसात बऱ्याच शेतातील पीक निघण्याची शक्यता होती. असे असताना या गारपिटीमुळे पिकाला चांगलाच फटका बसला. जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस दोन दिवस आणखी येण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) गव्हाचा रंग व चमक धोक्यातया पावसामुळे व गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या गव्हाचा रंग व चमक जाणार आहे. यामुळे गव्हाच्या किंमती कमी घसरणे शक्य असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. खरीपपाठोपाठ रबी पिकावरही अस्मानी संकट आल्याने शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे.भाजीपाल्याला फटकाभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्वस्त मिळणारा भाजीपाला आता महागण्याचे संकेत आहेत. सांबार, मिरची, वांगे, फुलकोबी या पिकाला गारांचा चांगलाच तडाखा बसला आहे. बांधावर जावून सर्व्हे करण्याची मागणीशासकीय यंत्रणेने शेताच्या बांधावर जावून सर्वेक्षण केल्यास नुकसानीची खरीखुरी आकडेवारी समोर येईल. त्यामुळे नुकसानीचा सर्व्हे करताना कर्मचाऱ्यांनी काळजी घेवून शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी आहे.कृषी विभागाचा सर्व्हे सुरू सतत दोन दिवस झालेल्या या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. अशात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाच्यावतीने सर्व्हेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या नुकसानाची माहिती मिळेल असे कृषी त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.