शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षणाचे २५ राजदूत दिल्ली वारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:32 IST

दिवसेंदिवस मूल्य शिक्षणाचा ºहास होत असून त्याचे परिणाम म्हणून समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि हिंसा पहावयास मिळते.

ठळक मुद्देगांधी जिल्ह्याचा अनोखा उपक्रम : चार दिवसात घेणार गांधींच्या स्मृतीस्थळांची भेट

आॅनलाईन लोकमतवर्धा : दिवसेंदिवस मूल्य शिक्षणाचा ºहास होत असून त्याचे परिणाम म्हणून समाजात अशांतता, जातीभेद, असहिष्णुता आणि हिंसा पहावयास मिळते. मूल्यसंस्काराचे बाळकडू लहानपणीच मुलांना मिळावे आणि सुदृढ, समतोल विचारांची पिढी घडावी म्हणून गांधी जिल्हा अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्याने पुढाकार घेत एक अनोखा उपक्रम राबविला आहे. महात्मा गांधींनी दिलेले वचन आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी निवड करण्यात आलेल्या २५ ‘ब्रँड अँबेसिडर’ विद्यार्थ्यांना आज विमानाने दिल्लीवारी करण्याची संधी मिळाली. खा. रामदास तडस आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विद्यार्थ्यांच्या गाडीला हिरवी झेंडी दाखवून मुलांना रवाना केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने बालकांमध्ये शालेय अवस्थेपासून गांधीजींचे मूल्य रूजवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून जिल्हा प्रशासनाच्यावतीने २ आॅक्टोबर २०१६ पासून उडाण प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग, गांधी विचार परिषद आणि नई तालीम सेवाग्राम यांचे सहकार्य घेण्यात आले.सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका आणि काही खासगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. मुलांना विविध प्रात्यक्षिक आणि स्पर्धेच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय मूल्यांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून आणि विविध उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. त्याचबरोबर सार्थक जीवनासाठी मूल्यशिक्षण अंतर्गत संस्कारपर्व पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, शांती, अहिंसा, सहिष्णूता, संवेदनशिलता, सौजन्य, श्रमप्रतिष्ठा, स्त्री पुरूष समानता, वक्तशीरपणा या दहा मूल्यांवर आधारीत शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी स्वत: मुख्याध्यापकांचे या विषयांवर उद्बोधन केले. वर्षभरापासून सुरू असलेल्या या उपक्रमात शाळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची शाळा, केंद्र, तालुका आणि जिल्हास्तर अशा विविध टप्प्यावर सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतचे १ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील २५ विद्यार्थी गुणवत्तेत चमकले. यात ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील २० विद्यार्थी आहेत. या २५ विद्यार्थ्यांना मूल्य संस्काराचे राजदूत म्हणून दिल्लीवारी करण्याची संधी उडाण प्रकल्पाद्वार ेमिळाली आहे.या वारीत चार दिवस विद्यार्थी गांधीजींचे वास्तव्य असलेली ठिकाणे आणि संस्थांना भेट देतील. तसेच राष्ट्रपती भवन, संसद भवन, संसदेतील ग्रंथालय, इंडिया गेट आणि दिल्लीतील महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन माहिती घेतील. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद शाळांमधील पाच शिक्षक आणि डाएटच्या प्रा. महाजन सहभागी झाल्या असून त्या विद्यार्थ्यांना माहिती देणार आहे.