शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

२४ हजार ७०० शेतकरी ठरले पीक विम्यास पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

निसर्गाच्या कालचक्रात खरीप हंगामाचा पार बोजवारा उडाला. सोयाबीन पीक पावसाने गडप केले. सोयाबीनची आराजी घडली. जास्त पावसामुळे मोठे नुकसान झाले. कपाशीचे पिकही हातून जाण्याची दाट शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडल्यावर शासनाने सर्व्हे करणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्याप आदेश दिले नाही. त्यामुळे पीक विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे आल्या नाही.

ठळक मुद्देनियम डावलण्यात कंपन्यांचा हातखंडा : विमा काढूनही मदत मिळेना

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे कपाशी, सोयाबीन पिकांची प्रचंड हानी झाली आहे. उत्पादन बुडाले अशा स्थितीत हक्काने काढलेला पीक विमा तारणार अशी आशा बाळगून असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येणार असल्याची शक्यता आहे. आर्वी उपविभागतील २४ हजार ७०० शेतकऱ्यांनी विमा काढला असून ते पात्रही ठरले. मात्र मदतीच्या नियमात कंपन्या अपात्र ठरविणार असल्याचा आरोप आता शेतकरी बांधवांकडून केल्या जात आहे. त्यामुळे यामध्ये शासनाने लक्ष घालून शेतकºयांना विमा दावा मंजूर करण्याची मागणी होत आहे.निसर्गाच्या कालचक्रात खरीप हंगामाचा पार बोजवारा उडाला. सोयाबीन पीक पावसाने गडप केले. सोयाबीनची आराजी घडली. जास्त पावसामुळे मोठे नुकसान झाले. कपाशीचे पिकही हातून जाण्याची दाट शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस पडल्यावर शासनाने सर्व्हे करणे क्रमप्राप्त होते. मात्र अद्याप आदेश दिले नाही. त्यामुळे पीक विमा कंपन्या नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे आल्या नाही. विमा हप्ता भरला एवढ्यावरच पीक विमा योजना गुंडाळणार काय? अशीच काहीशी स्थिती दिसत आहे.आर्वी तालुक्यात ९ हजार ४५० शेतकºयांनी आष्टी (शहीद) तालुक्यात ६ हजार २२८ शेतकºयांनी तर कारंजा तालुक्यातील ९ हजार २२ शेतकºयांनी पीक विमा काढला होता. या सर्व शेतकºयांना नुकसान झाल्यामुळे मदतीची प्रतीक्षा आहे. भरपूर पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाची हानी झाली आहे. लागवडीपासून उत्पादनापर्यंत एकूण खर्च पाहता पीक विमा राशी मिळाल्यास शेतकºयांना न्याय मिळेल, मात्र तसे होताना दिसत नाही.काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी मुंबई येथे पीक विमाबाबत कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या अधिकाºयांची बैठक घेतली होती. यामध्ये विदर्भातील पीकविमा मदतीवर बरीच चर्चा झाली होती. दरवर्षी विदर्भावरच अन्याय होत असल्याने भेदभाव संपवून फक्त शेतकरी एवढाच उद्देश ठेवून सर्वांना मदत देण्याचे आदेश दिले होते. पण; अद्यापही कंपन्यांच्या अधिकाºयांनी अंमलबजावणी प्रक्रियेत सुधारणा केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतरही पीक विमा योजना वाºयावरच आहे.अशी आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनाकेंद्र शासनाच्या धोरणानुसार १९८३ साली पीक विमा योजना सुरू झाली. नंतर १९९९ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू झाली. पुन्हा केंद्र सरकारने १३ जानेवारी २०१६ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणून मंजूरी दिली. संपूर्ण यंत्रणेमध्ये एकच विमा कंपनी असून खासगी विमा कंपन्या अ‍ॅग्रीकल्चर इंन्शुरंस कंपनी आॅफ इंडियाशी जोडण्यात आल्या. त्याचा मोठा विस्तार झाला. त्या शासनाच्या अखत्यारीत असूनही शेतकऱ्यांना दावे मंजूर करण्यास कंपन्या दुर्लक्ष करतात.कोणत्या शेतकऱ्यांना ठरविणार पात्र?शेतात पाणी साचणे, पूर येणे, पीक खरडून जाने, नैसर्गिक आपत्ती आणि वेळेवर अचानक आलेल्या संकटाला मध्यस्थानी ठेवून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याचे जाहीर केले. मात्र विमा कंपन्या याकडे लक्षच देत नाही. आपलीच मनमानी चालवून शेतकऱ्यांची लूट करत आहे.खरीप हंगामात सोयाबीन, कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. आदेश प्राप्त झाल्यावर नुकसानीचा सरसकट सर्व्हे करून शासनाला अहवाल सादर करणार, त्यानंतर शेतकरी पात्र ठरणार आहे.एम.जे. तोडकर, तालुका कृषी अधिकारी, आष्टी (शहीद)पीक विम्याची पीकनिहाय नुकसान भरपाईनुकसान भरपाई ही उंबरठा उत्पन्नातून चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न याचा आढावा व रिपोर्ट घेवून ६० टक्के जोखीम स्तर ठरविले जाते. कृषी विभागाला मध्यस्थानी ठेवून कंपन्या मनमानी करून नेहमीच कमी नुकसान दाखविते. यासाठी व्यापक बदल होेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा