शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

पाटबंधारे विभागात २३४ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:18 IST

सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे.

ठळक मुद्देअधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप : करावे लागते नेहमीच अतिरिक्त काम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी जिल्ह्यात कार्य करणाऱ्या पाटबंधारे विभागाला सध्या अल्प मनुष्यबळामुळे घरघर लागली आहे. या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल २३४ पदे रिक्त असल्याने कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अधिकच्या कामाचा भार पडत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.प्राप्त माहितीनुसार वर्धा पाटबंधारे विभागात उप कार्यकारी अभियंत्यांचे एक पद मंजूर असून ते गत अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. तर कनिष्ठ अभि./शाखा अभि. /स.अ.श्रेणी-२ चे दोन पदे रिक्त आहेत. आरेखकचे एक, सहा. आरेखकचे एक, वरिष्ठ लिपीकाचे एक, कनिष्ठ लिपीकाचे दोन, टंकलेखकाचे एक, अनुरेखकाचे दोन, स्था. अभियांत्रिकी सहा.चे १२, वाहन चालकाचे तीन, नाईकचे एक, शिपाईचे १६, चौकीदाराची दोन पदे रिक्त आहेत. इतकेच नव्हे तर दप्तर कारकुणची १७, कालवे निरीक्षकाची ७९, मोजणीदारची ४२, संदेशकची ११, कालवे चौकीदारची ३१, कालवे टपलीची नऊ पदे रिक्त आहेत. वर्धा पाटबंधारे विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण ३३५ पदे मंजूर असली तरी सध्यास्थिती या विभागात केवळ १०१ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अल्प मनुष्यबळामुळे विविध कामे प्रभावित होत असल्याने सदर विभागात पुरेसे मनुष्यबळ कार्यरत करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.पाण्याचा अपव्यय रोखणे ठरतेय कठीणकालवे निरीक्षकांची ८८ पदे मंजुर असताना सध्या केवळ नऊच कर्मचारी सदर पदावर कार्यरत असल्याचे वास्तव आहे. प्रकल्पातील पाणी सोडल्यावर कुठला कालवा फटला तर नाही ना तसेच कुठे पाण्याचा अपव्यय तर होत नाही ना याची शहानिशा हे कर्मचारी करतात. परंतु, अल्पमनुष्यबळामुळे सध्या होणारा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी अनेक अडचणींचा सामनाच वर्धा पाटबंधारे विभागाला करावा लागत आहे.सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकालवे चौकीदार महत्त्वाचे ठरतात. परंतु, सध्यास्थितीत ३३ पैकी ३१ कालवे चौकीदारांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पाठपुराव्याकडे दुर्लक्षच?वर्धा पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहणच लागले आहे. तेथे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत व्हावे यासाठी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे; पण संबंधित अधिकारी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्षच करीत असल्याने कार्यरत कर्मचाºयांच्या अडचणीत भर पडली आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प