शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

नऊ महिन्यांत २,३०७ गर्भपात

By admin | Updated: January 17, 2016 01:54 IST

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा....

जिल्ह्यात अनधिकृत व्यवसायाचा संशय एकूण ३० खासगी डॉक्टरांना कायद्यानुसार परवानगी रूपेश खैरी वर्धास्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा संशय गुरुवारी रामनगर येथे उघड्यावर सापडलेल्या मृत अर्भकामुळे बळावला आहे. शिवाय हा प्रकार अनधिकृतच असल्याचा सूर आरोग्य विभागानेही काढला आहे. शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २ हजार ३०७ गर्भपात अधिकृतरित्या झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद असून हा आकडाही धक्कादायक असाच आहे. जिल्ह्यात झालेल्या या गर्भपाताची सरासरी काढल्यास महिन्याकाठी जिल्ह्यात २५७ गर्भपात होत असल्याचे निष्पन्न होते. यामागे नेमके कारण काय, ही बाब संशय दाट करणारी आहे. यातील सर्वाधिक आकडा खासगी रुग्णालयातील आहे. जिल्ह्यात ३० खासगी रुग्णालयांना गर्भपात करण्याची परवानगी आहे. कायद्याचे पालन करण्याची सक्ती आहे. गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकारातून कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे कितपत सुरू आहे, ही बाब प्रश्नांकित करणारी आहे. खासगी रुग्णालयात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत एकूण १ हजार ९४१ गर्भपात झाले, तर पाचही शासकीय रुग्णालयात एकूण ३६६ गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही नोंद शासनाच्या नियमानुसार आल्याचे दर्शविण्यात आले आहे. गर्भपातानंतर अर्भकाच्या विल्हेवाटीसाठीही शास्त्रीय पद्धत आहे. मात्र ही पद्धत पाळली जाते वा नाही, ही बाब रामनगर परिसरात उकिरड्यावर कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या अर्भकावरुन विचारात घेण्यासारखे आहे. गर्भपातासंदर्भात कायदा कठोर करण्यात आला तरी तो सोईनुसार वळविल्या जात असल्याची चर्चा आहे. केवळ नियम म्हणून त्याची नोंद करीत जिल्ह्यात गर्भपाताचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे नाकारता येत आहे. याच नियमांच्या आधारे असे किती अनधिकृत गर्भपात झाले असतील हे सांगणे कठीण आहे. विभागाने सर्व बाबींसह संबंधित महिलेची प्रत्यक्ष माहिती घेतल्यास वास्तव लक्षात येईल.नियमानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी शासनाने कायदा कठोर केला तरी खरच गर्भपाताची गरज असलेल्यांकरिता त्यात मुभा दिली आहे. ही मुभा देताना मात्र काही अटी लादल्या आहेत. या अटींनुसार २० आठवड्यांच्या गर्भवतीला कायद्यानुसार गर्भपात करण्याची परवानागी आहे. या कालावधीनंतर गर्भपात करण्याकरिता महिलेला विशेष समितीची परवानगी घ्यावी लागते. या समितीकडून बलात्कार, कुमारी माता किंवा गर्भात वाढत असलेल्या अर्भकाला काही अपंगत्त्व आल्यास महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यात येते. रामनगर येथे आढळलेले अर्भक साडेआठ महिन्याचे असल्याचे सांगण्यात आले. त्याची नोंद येथे झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून वर्धेत अनधिकृत गर्भपात होत असल्याला दुजोरा मिळत आहे.