शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

नऊ महिन्यांत २,३०७ गर्भपात

By admin | Updated: January 17, 2016 01:54 IST

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा....

जिल्ह्यात अनधिकृत व्यवसायाचा संशय एकूण ३० खासगी डॉक्टरांना कायद्यानुसार परवानगी रूपेश खैरी वर्धास्त्रीभ्रूणहत्या रोखण्याकरिता शासनाच्या वतीने कायदा कठोर केला. त्यामुळे अनधिकृत गर्भपातावर लगाम बसेल असे वाटत असताना वर्धेत खुलेआम गर्भपात होत असल्याचा संशय गुरुवारी रामनगर येथे उघड्यावर सापडलेल्या मृत अर्भकामुळे बळावला आहे. शिवाय हा प्रकार अनधिकृतच असल्याचा सूर आरोग्य विभागानेही काढला आहे. शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यात नऊ महिन्यांत तब्बल २ हजार ३०७ गर्भपात अधिकृतरित्या झाल्याची आरोग्य विभागाकडे नोंद असून हा आकडाही धक्कादायक असाच आहे. जिल्ह्यात झालेल्या या गर्भपाताची सरासरी काढल्यास महिन्याकाठी जिल्ह्यात २५७ गर्भपात होत असल्याचे निष्पन्न होते. यामागे नेमके कारण काय, ही बाब संशय दाट करणारी आहे. यातील सर्वाधिक आकडा खासगी रुग्णालयातील आहे. जिल्ह्यात ३० खासगी रुग्णालयांना गर्भपात करण्याची परवानगी आहे. कायद्याचे पालन करण्याची सक्ती आहे. गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकारातून कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे कितपत सुरू आहे, ही बाब प्रश्नांकित करणारी आहे. खासगी रुग्णालयात एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत एकूण १ हजार ९४१ गर्भपात झाले, तर पाचही शासकीय रुग्णालयात एकूण ३६६ गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही नोंद शासनाच्या नियमानुसार आल्याचे दर्शविण्यात आले आहे. गर्भपातानंतर अर्भकाच्या विल्हेवाटीसाठीही शास्त्रीय पद्धत आहे. मात्र ही पद्धत पाळली जाते वा नाही, ही बाब रामनगर परिसरात उकिरड्यावर कुजलेल्या स्थितीत आढळलेल्या अर्भकावरुन विचारात घेण्यासारखे आहे. गर्भपातासंदर्भात कायदा कठोर करण्यात आला तरी तो सोईनुसार वळविल्या जात असल्याची चर्चा आहे. केवळ नियम म्हणून त्याची नोंद करीत जिल्ह्यात गर्भपाताचा गोरखधंदा सर्रास सुरू असल्याचे नाकारता येत आहे. याच नियमांच्या आधारे असे किती अनधिकृत गर्भपात झाले असतील हे सांगणे कठीण आहे. विभागाने सर्व बाबींसह संबंधित महिलेची प्रत्यक्ष माहिती घेतल्यास वास्तव लक्षात येईल.नियमानुसार २० आठवड्यांपर्यंत गर्भपाताची परवानगी शासनाने कायदा कठोर केला तरी खरच गर्भपाताची गरज असलेल्यांकरिता त्यात मुभा दिली आहे. ही मुभा देताना मात्र काही अटी लादल्या आहेत. या अटींनुसार २० आठवड्यांच्या गर्भवतीला कायद्यानुसार गर्भपात करण्याची परवानागी आहे. या कालावधीनंतर गर्भपात करण्याकरिता महिलेला विशेष समितीची परवानगी घ्यावी लागते. या समितीकडून बलात्कार, कुमारी माता किंवा गर्भात वाढत असलेल्या अर्भकाला काही अपंगत्त्व आल्यास महिलेला गर्भपाताची परवानगी देण्यात येते. रामनगर येथे आढळलेले अर्भक साडेआठ महिन्याचे असल्याचे सांगण्यात आले. त्याची नोंद येथे झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून वर्धेत अनधिकृत गर्भपात होत असल्याला दुजोरा मिळत आहे.