शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत

By admin | Updated: February 20, 2017 01:15 IST

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे.

करवसुली मोहिमेत ४१ ग्रा.पं. सहभागी : गटविकास अधिकाऱ्यांचाही पुढाकारआष्टी (शहीद) : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे. यात जागेच्या क्षेत्रफळानुसार घर कर व वापरानुसार पाणी कर आकारला जातो. या करापोटी तालुक्यात २२ लाख रुपये थकित आहेत. मार्च अखेरपर्यंत वसुली व्हावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी ४१ ग्रामपंचायतींना पत्र देत त्वरित कराची वसुली करा, असे निर्देश दिलेत. थकित कर वसुली झाल्यास प्रलंबित समस्यांवर खर्च करता येणार आहे. यामुळे सर्व ग्रामसेवक करवसुली मोहीम राबवित आहेत.आष्टी तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. आष्टी नगर पंचायत झाल्याने येथील करवसुली यंत्रणा स्वतंत्र आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कराचा भरणा करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी घरमालकांना वसुलीबाबत नोटीस बजावल्या आहेत. ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामसेवक मिळून वसुलीला फिरतात. काही ठिकाणी वसुली मिळते तर काही ठिकाणी शेतमाल विकायचा आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती नाही, यामुळे नंतर कराचा भरणा करू, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.ग्रामपंचायतकडून सार्वजनिक नाल्या उपसणे, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे, लाईट बसविणे या प्रमुख कामांसह देखभाल दुरूस्तीसाठी प्रयत्न होताना दिसून येतात. पाणीपट्टी वसूल करून विजेच्या बिलाचा भरणा करावा लागतो. कराची वसुली कमी झाली वा झालीच नाही तर बिल कसे भरावे, असा प्रश्न ग्रामसेवकांसमोर उभा ठाकला आहे. सततचा तणाव, नागरिकांच्या तक्रारी यातून कधी मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. शासनाने ग्रामपंचायतला अधिकचे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे ग्रामविकास हे उदीष्ट समोर ठेवून सर्वंकष विकासावर भर देणे सुरू केले आहे. आष्टी तालुक्यातील कर मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पंचायत स्तरावर वारंवार आढावा घेतला जात आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन्ही वर्षांची वसुली ६० टक्के झाली आहे. उर्वरित ४० टक्के वसुलीमधील २५ टक्के वसुली मार्च अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींनी वरचेवर कराचा भरणा केल्याचे दिसून येते. विविध प्रमाणपत्र देण्यापूर्वी करवसुली केली काय, ही अट असल्याने वसुलीस हातभार लागत असल्याचे दिसते. तालुक्यातील साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, तळेगाव, या मोठ्या गावांसह सर्व गावांत करवसुली मोहीम धडाक्याने सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)ग्रामविकासाला चालना देण्याचे प्रयत्नशासनाकडून गामपंचायत प्रशासनाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामविकासाला चालना मिळावी, हा या मागील हेतू आहे. आता हा हेतू साध्य करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांना झटावे लागणार आहे. ग्रा.पं. ला मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास साधावा लागतो. यामुळे सध्या तालुक्यात घर आणि पाणी कर वसुलीवर भर दिला जात आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी करवसुली पूर्ण झाल्यास हातभार लागेल. नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी घरोघरी भेटी देवून कर वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले आहे.- ए.बी. मरबड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).