शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

घर, पाणी करापोटी २२ लाख थकीत

By admin | Updated: February 20, 2017 01:15 IST

पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे.

करवसुली मोहिमेत ४१ ग्रा.पं. सहभागी : गटविकास अधिकाऱ्यांचाही पुढाकारआष्टी (शहीद) : पंचायतराज व्यवस्थेंतर्गत ग्रामीण व शहरी भागात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांसाठी करप्रणाली बांधून देण्यात आली आहे. यात जागेच्या क्षेत्रफळानुसार घर कर व वापरानुसार पाणी कर आकारला जातो. या करापोटी तालुक्यात २२ लाख रुपये थकित आहेत. मार्च अखेरपर्यंत वसुली व्हावी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी ४१ ग्रामपंचायतींना पत्र देत त्वरित कराची वसुली करा, असे निर्देश दिलेत. थकित कर वसुली झाल्यास प्रलंबित समस्यांवर खर्च करता येणार आहे. यामुळे सर्व ग्रामसेवक करवसुली मोहीम राबवित आहेत.आष्टी तालुक्यात एकूण ४१ ग्रामपंचायती आहेत. आष्टी नगर पंचायत झाल्याने येथील करवसुली यंत्रणा स्वतंत्र आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कराचा भरणा करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी घरमालकांना वसुलीबाबत नोटीस बजावल्या आहेत. ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामसेवक मिळून वसुलीला फिरतात. काही ठिकाणी वसुली मिळते तर काही ठिकाणी शेतमाल विकायचा आहे, कुणाची आर्थिक परिस्थिती नाही, यामुळे नंतर कराचा भरणा करू, अशी उत्तरे मिळत आहे. यामुळे बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते.ग्रामपंचायतकडून सार्वजनिक नाल्या उपसणे, विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकणे, लाईट बसविणे या प्रमुख कामांसह देखभाल दुरूस्तीसाठी प्रयत्न होताना दिसून येतात. पाणीपट्टी वसूल करून विजेच्या बिलाचा भरणा करावा लागतो. कराची वसुली कमी झाली वा झालीच नाही तर बिल कसे भरावे, असा प्रश्न ग्रामसेवकांसमोर उभा ठाकला आहे. सततचा तणाव, नागरिकांच्या तक्रारी यातून कधी मोठ्या प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. शासनाने ग्रामपंचायतला अधिकचे अधिकार प्रदान केले आहेत. यामुळे ग्रामविकास हे उदीष्ट समोर ठेवून सर्वंकष विकासावर भर देणे सुरू केले आहे. आष्टी तालुक्यातील कर मोहीम यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पंचायत स्तरावर वारंवार आढावा घेतला जात आहे. २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन्ही वर्षांची वसुली ६० टक्के झाली आहे. उर्वरित ४० टक्के वसुलीमधील २५ टक्के वसुली मार्च अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधींनी वरचेवर कराचा भरणा केल्याचे दिसून येते. विविध प्रमाणपत्र देण्यापूर्वी करवसुली केली काय, ही अट असल्याने वसुलीस हातभार लागत असल्याचे दिसते. तालुक्यातील साहुर, भारसवाडा, लहानआर्वी, अंतोरा, तळेगाव, या मोठ्या गावांसह सर्व गावांत करवसुली मोहीम धडाक्याने सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)ग्रामविकासाला चालना देण्याचे प्रयत्नशासनाकडून गामपंचायत प्रशासनाला अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ग्रामविकासाला चालना मिळावी, हा या मागील हेतू आहे. आता हा हेतू साध्य करण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामसेवकांना झटावे लागणार आहे. ग्रा.पं. ला मिळणाऱ्या कराच्या उत्पन्नातून तसेच शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून गावाचा विकास साधावा लागतो. यामुळे सध्या तालुक्यात घर आणि पाणी कर वसुलीवर भर दिला जात आहे. गावातील समस्या सोडविण्यासाठी करवसुली पूर्ण झाल्यास हातभार लागेल. नागरिकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी घरोघरी भेटी देवून कर वसुली मोहीम राबविण्याचे निर्देश ग्रामसेवकांना दिले आहे.- ए.बी. मरबड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, आष्टी (श.).