शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

२२९ गावांना पाणी टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 23:53 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून ३९१ उपाययोजनांवर ६ कोटी २ लाख रुपयांचा खर्च

आॅनलाईन लोकमतवर्धा : उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाई डोके वर काढते. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या उपाययोजना आखल्या जातात. परंतु यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या जात नाही. यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार आहे. या गावांतील नागरिकांना दिलासा देण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने ६ कोटी २ लाख रुपयांचा आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.गत उन्हाळ्याच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई असलेली गावे कमी असल्याचे मंजुर आराखड्यावरून दिसत आहे. गत उन्हाळ्यात २८६ गावात पाणीटंचाई जाणवल्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. या गावातील पाणी टंचाई निवारण्याकरिता ४७८ उपाययोजनांवर ७ कोटी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ऐवढी रक्कम खर्च होवूनही यंदा २२९ गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवणाºया गावात ३९१ उपाययोजना आखण्यात आल्या आहे.करण्यात येणाºया उपाययोजनापाणी टंचाई निवारण्याकरिता टंचाईग्रस्त गावात ४६ विहिरीचे खोलीकरण तर १२९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. १२४ नळयोजनांची दुरुस्ती करण्यात येणार असून तात्पूरती पुरक योजना म्हणून एक योजना मंजूर करण्यात आली आहे. सध्या टंचाई असलेल्या गावात सात उपाययोजनांची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. या उपाययोजना तीन महिन्याकरिता असल्याचे सांगण्यात आले आहे.१५ जलाशयात ४१.३८ टक्के जलसाठावर्धा जिल्ह्यात मोठे आणि मध्यम असे मिळून १५ जलाशय आहेत. या जलाशयातून शेतीच्या सिंचनासह व्यवसाय, उद्योग व नागरिकांना पिण्यासाठी पाणी पुरविले जाते. सध्या या जलाशयात पाण्याची स्थिती ठिकठाक असली तरी उन्हाळ्याच्या दिवसात झपाट्याने घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या या जलाशयात ४१.३८ टक्के उपयुक्त जलसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.अत्यल्प पावसामुळे स्थिती बिकटजिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे जलसाठे पूर्णत: भरले नाही. परिणामी हिवाळ्याच्या अखेरीसच पाण्याची पातळी निम्यापेक्षा कमी आहे. यातच यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार असल्याचे भाकित हवामान खात्याने वर्तविले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या जलसाठ्यात पाणी राहील अथवा नाही याबाबत साशंकता आहे.