शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२.१६ लाख शेतकरी आरक्षणाच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 22:33 IST

शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देकेवळ सहा जणांची असंमती : शैलेश अग्रवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरु झाला. शेतकरी आरक्षणाबाबत मत जाणून घेण्यासाठी ‘डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू. किसान आरक्षण डॉट कॉम’ हे संकेत स्थळ सुरू करण्यात आले. त्यावर आतापर्यंत काही लोकप्रतिनिधींसह एकूण २ लाख १६ हजार ३१४ नागरिकांनी शेतकरी आरक्षणासंदर्भात संमती दर्शविली आहे. तर केवळ सहा जणांनी असंमती दर्शविली आहे, अशी माहिती शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी दिली आहे.आपण देशापूढे शेतकरी आरक्षणाची संकल्पना मांडली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि तेवढ्याच आत्मीयतेने मांडलेल्या शेतकरी आरक्षणाच्या विषयाला ठिकठिकाणी शेतकºयांनी स्वीकारले आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी व असंख्य ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत शेतकºयांच्या आरक्षणाचा ठराव घेतला असून सरकार मधील मंत्र्यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी सर्वप्रथम या विषयाला आपले समर्थन दर्शविले होते. हा लढा सर्वत्र जोर धरत असतांना खुद्द देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकºयाना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी स्पष्टोक्ती केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही याविषयी आपण भेट घेऊन माहिती दिली. सर्वच पक्षातील नेत्यांनी शेतकरी हितार्थ या मुद्यावर एकत्रित येण्याची गरज असल्याची भावना असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.सेवाग्राम येथून सुरुझालेला शेतकरी आरक्षणाचा लढा महाराष्ट्रासह देशाच्या उत्तरेतील हरियाणापर्यंत जाऊन पोहचला आहे. हरियाणातील एका गावामध्ये गावकºयांनी ग्रामसभा घेऊन शेतकºयांना आरक्षण मिळाले पाहिजे असा ठराव ग्रामसभेत घेतला आहे. आरक्षण हा विषय देशाला नवीन नाही; पण आजवर जातीच्या आधारावर आरक्षण देण्यात आले असून शेतकरी आरक्षण या विषयी केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हित लक्षात घेऊन तात्काळ योग्य निर्णय द्यावा, अशी मागणीही शैलेश अग्रवाल यांची आहे.