शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २,११६ कुटुंबे शौचालयापासून अद्याप वंचितच ! 'स्वच्छ भारत'चा बार फुसकाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:26 IST

Wardha : पंचायत समितीला ४५६ अर्ज नव्याने झाले प्राप्त

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :स्वच्छ भारत अभियानाचा डंका पिटत २०१४ मध्ये घरोघरी शौचालयाची योजना सुरू झाली. त्यांतर्गत घरोघरी शौचालये उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात अनेक कुटुंबे शौचालयाविना आहेत. जिल्ह्यात १६ हजार ४६९ कुटुंबांनी शौचालयासाठी अर्ज केले असून, यापैकी २ हजारांवर कुटुंबे शौचालयापासून वंचित आहेत.

दहा वर्षांपूर्वी देशात भाजपचे सरकार आल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाची घोषणा झाली. त्याची परिणामकारकरित्या अंमलबजावणीही झाली. खेडोपाडी शौचालये झाली. रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांची संख्या घटली. हे खरे असले तरी हे अभियान १०० टक्के यशस्वी झाले नसल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत हद्दीतील खेडी उघड्यावर नैसर्गिक विधी करण्यापासून मुक्त झाल्याचा दावा करण्यात आला. तशी कागदोपत्री घोषणा २०१९ मध्ये केंद्र व राज्य सरकारनेही केली आहे. परंतु, प्रत्यक्षात सरकारने कागदी घोडे नाचविल्याचे स्पष्ट होते. कारण, आजही दोन हजारांवर कुटुंबांकडे शौचालये नाहीत. ही कुटुंबे उघड्यावरच नैसर्गिक विधी आटोपतात, ही वस्तुस्थिती आहे.

नागरिकांतील अंधविश्वास दूर कोण करणार?खेडेगावांमध्ये शेतवडीत अनेक ठिकाणी शौचालये बांधलेली आहेत. विशेष म्हणजे ही शौचालये गोबरगॅसला जोडलेली आहेत, परंतु, अनेक कुटुंबांमध्ये शौचास जायचे अन् त्यातून तयार होणाऱ्या गॅसवर अन्न शिजवायचे, हा प्रकार घाणेरडा वाटतो. त्यामुळे, अनेकजण अद्याप शौचालयाचा वापर न करता आपल्या शेतवडीत उघड्यावर शौचास जातात, याबाबतचा अंधविश्वास दूर करण्याची गरज आहे.

शौचालय आहे, पण पाणी कुठे?अनेक गावांमध्ये शौचालये आहेत. परंतु, त्याचा वापर करण्यासाठी पुरेसे पाणी नाही. पाण्याची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी फक्त आकडेवारी पूर्ण केल्याचेदाखविण्यासाठी शौचालयांची निर्मिती झाली आहे. सार्वजनिक शौचालयांसाठी आलेल्या अनुदानातून शौचालयांची निर्मिती झाली आहे का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

खुले शौचमुक्त गाव तथा ओडीएफचे निकषएखाद्या गावात प्रत्येक कुटुंबासाठी शौचालय असणे गरजेचे आहे. घरात स्वतंत्र शौचालय नसेल तर ५०० मीटरच्या आत सार्वजनिक शौचालय हवे.त्या गावातील कुणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

आकडेवारीवर एक नजरतालुका                उद्दिष्ट                 वंचितआर्वी                   २,३१४                 १५३आष्टी                   १,३७४                  ९१देवळी                  १७,६७               १७८हिंगणघाट             २,५६८               ५२९कारंजा                 २,५७०               ५७०समुद्रपूर               २,४२०                १४५सेलू                     १,१७१                 १९०वर्धा                     २,२८५                २६०

नव्याने ४५६ अर्जशासनाने कितीही खुले शौचमुक्त अर्थात ओडीएफची (ओपन डिफेकेशन फ्री) घोषणा केली तरी अद्याप ४५६ कुटुंबांनी नव्याने शौचालयासाठी अर्ज केले आहेत. हिंगणघाट तालुक्यातून सर्वाधिक १२४ अर्ज आले असून, कारंजा तालुक्यातून ६९ अर्ज आले आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान