शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मदुुराई एक्स्पे्रसने २०१ मजुरांचे वर्ध्यात होणार आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 05:00 IST

लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्याकरिता शासनाने मार्ग मोकळा करुन दिला. आधी महाराष्ट्रात अडकेलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले तर आता इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही परत आणण्याची व्यवस्था केली आहे. तामिळनाडू येथून निघालेल्या मधुराई एक्सपे्रसमध्ये महाराष्ट्रातील १ हजार ३५८ मजुरांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाकडून तयारी : आठ जिल्ह्यातील मजुरांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परराज्यात अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही आणण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु केले आहे. त्यामुळे तामिळनाडू येथून मदुुराई एक्स्पे्रसने निघालेल्या वर्ध्यासह अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या आठ जिल्ह्यातील २०१ मजुरांचे सोमवारी सांयकाळी ५ वाजता वर्ध्याच्या मुख्य रेल्वेस्थानकावर आगमण होणार आहे. बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर अडकून पडले. त्यामुळे त्यांना आपापल्या गावी जाण्याकरिता शासनाने मार्ग मोकळा करुन दिला. आधी महाराष्ट्रात अडकेलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले तर आता इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजुरांना स्वगृही परत आणण्याची व्यवस्था केली आहे. तामिळनाडू येथून निघालेल्या मधुराई एक्सपे्रसमध्ये महाराष्ट्रातील १ हजार ३५८ मजुरांचा समावेश आहे. ही एक्सपे्रस पुणे, मनमाड, परभणी व वर्धा या चार ठिकणी थांबा घेणार आहे. या ठिकाणी लगतच्या जिल्ह्यातील मजुरांना उतरवून तेथून त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून तेथील जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वर्ध्यात सोमवारी सायंकाळी ही एक्सपे्रस येणार असून २०१ मजूर उतरणार आहे. त्यामध्ये वर्धा अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोेंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील मजुरांचा समावेश आहे. वर्ध्यात आल्यानंतर या सर्व मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याकरिता बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवस्थेकरिता रविवारी रेल्वेस्थानकाच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.दहा बसेसची केली व्यवस्थासोमवारी सायंकाळी मधुराई एक्सपे्रसने वर्ध्याच्या मुख्य रेल्वेस्थानकावर येणाºया २०१ मजुरांची आधी आरोग्य पथकाकडून तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्यात येणार आहे. त्यासाठी दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये वर्धा, अकोला, अमरावती, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याकरिता प्रत्येकी एक तर नागपूर व गोंदियाकरिता प्रत्येकी दोन बसचा समावेश आहे. लांबच्या प्रवासावरुन आलेल्या या मजुरांची भोजनाचीही व्यवस्था प्रशासनाकडून केली आहे. आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांची नोंदणी करुन बसमध्ये बसविण्यात येईल. सोशल डिस्टंन्सिग पाळून बसमध्ये आसन व्यवस्था केली असून त्यांच्या आसनावरच भोजनाची बॉक्स ठेवलेले असणार आहे.शासनाच्या आदेशानुसार मधुराई एक्सपे्रसने वर्ध्यात येणाºया २०१ मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात पोहोचविण्याकरिता दहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्ध्यातीलही मजुरांचा समावेश असून त्यांची तपासणी करुन त्यांना असलेल्या लक्षणावरुन संस्थात्मक किंवा होम क्वारंटाईन केले जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे