शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

बस बंदमुळे वर्धेत २० लाखांचा फटका

By admin | Updated: December 18, 2015 02:34 IST

वेतन वाढीची मागणी करीत परिवहन महामंडळा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी राज्यव्यापी संप पुकाराला. यात वर्धेत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

१,६०० कर्मचारी संपावर : २७७ बसगाड्या जागीच उभ्या वर्धा : वेतन वाढीची मागणी करीत परिवहन महामंडळा कर्मचाऱ्यांनी गुरुवारी राज्यव्यापी संप पुकाराला. यात वर्धेत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. येथून एकही बस धावली नाही. यामुळे परिवहन महामंडळाच्या वर्धा विभागाला सुमारे २० लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती आहे. या संपामुळे मात्र प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागला. प्रवाश्यांना संपाची माहिती मिळताच त्यांनी मिळेल त्या वाहनाने जात आपले स्थळ गाठण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या संदर्भात झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याने हा संप शुक्रवारीही तसाच राहणार असल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. वर्धेत पहाटे ५ वाजतापासून या संपाला प्रारंभ झाला. महामंडळाच्या वर्धा विभागात असलेल्या १,७०० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे १,६०० कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे. या संपामुळे जिल्ह्यातील पाच डेपोतील बस जागच्या जागीच उभ्या राहिल्या. रात्री हाल्टींग म्हणून गेलेल्या बसगाड्या पहाटेच्या सुमारास आगारात गोळा झाल्या. येथून सायंकाळपर्यंत एकही बस निघाली नाही. दिवसभर कर्मचाऱ्यांनी आगारात शासनाविरोधात निदर्शने केली. जिल्ह्यात परिवहन विभागाचे एकूण पाच आगारातून काम सुरू आहे. या पाचही आगरात कार्यरत कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन अत्यल्प असल्याच्या विरोधात हा संप आहे. या संपात जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. वर्धेतील पाचही आगारातील २७७ बसगाड्यांची चाके थांबली होती. या पाचही आगारातून एका दिवसाला सुमारे १ लाख २ हजार किलोमिटरचे अंतर गाड्या कापत असल्याची माहिती परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आले. यामुळे एका दिवसात परिवहन विभागाला २० लाख रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात आले आहे.