शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

१९ वर्षांनी लढाई जिंकली; पण नोकरी मिळेना

By admin | Updated: June 10, 2017 01:26 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हिंगणघाट येथे कार्यरत दोन महिलांना १९९८ मध्ये पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले.

उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट : समाजकल्याण विभागाचीही टाळाटाळ लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह हिंगणघाट येथे कार्यरत दोन महिलांना १९९८ मध्ये पूर्वसूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. याविरूद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नोकरीत घेण्याचा निर्वाळा दिला. यावर शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. यातही अपिल खारीज करून महिलांच्या बाजूने निकाल देण्यात आला. तब्बल १९ वर्षांनी महिलांनी लढाई जिंकली; पण अद्याप त्यांना नोकरीवर रूजू करून घेण्यात आले नाही. हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह येथे विमल हिरामण खंडारे व छबू चंपत कसाळ दोन्ही रा. पुलफैल, वर्धा या मदतनीस, स्वयंपाकी म्हणून कार्यरत होत्या. १९८९ व १९९३ पासून त्या वसतिगृहामध्ये कर्तव्यावर होत्या. त्यांना कुठलेही कारण न देता वा पूर्वसूचना न देता १९९८ मध्ये अचानक कामावरून कमी करण्यात आले. या अन्यायाविरूद्ध त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ एप्रिल २००७ रोजी महिलांच्या बाजूने निकाल दिला. यात दोन्ही महिलांना स्वयंपाकी म्हणून कामावर रूजू करून घेण्याचे आदेश देण्यात आले. यावर शासनाने सर्वाेच्च न्यायालयात अपिल दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने ७ जून २०१६ रोजी शासनाचे अपिल खारीज करीत उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत जागा रिक्त असल्यास त्वरित कामावर घेण्याचे आदेश दिले. यावरून आरटीआय अंतर्गत माहिती घेतली असता जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, आर्वी व हिंगणघाट येथील वसतिगृहांमध्ये जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे पुर्ववत कामावर रूजू करून घ्यावे, अशी मागणी विमल खंडारे व छबू कसाळ यांनी केली आहे. याबाबत समाजकल्याण विभागाला निवेदनेही दिलीत; पण वर्ष लोटले असताना कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. जागा रिक्त असताना रूजू करून घेतले जात नसल्याने दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना दारिद्र्यात जगावे लागत आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान विमल खंडारे व छबू कसाळ या दोन्ही महिलांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. समाज कल्याण विभागाला त्यांना कामावर घेण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयानेही जागा रिक्त असल्यास कामावर रूजू करून घेण्याचे आदेश दिले; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहाच्या गृहपालांनी त्यांना रूजू करून घेतले नाही. यातून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात असल्याचेच दिसते. वसतीगृहात विद्यार्थी आल्याशिवाय आपली हजेरी नोंदविणे सुरू होणार नाही. असे वसतिगृहाच्या प्रमुखांनी सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही आपल्याला मानसिक त्रास दिल्या जात असल्याचे दोनही महिलांनी लोकमत कार्यालयात येवून सांगितले.