शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

१.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:17 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देदोन कृऊबातील महिन्याभऱ्याची स्थिती : शेतमाल तारण योजना ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे. मागील एक महिन्यात हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी कशी करावी असाच प्रश्न शेतकºयांसमोर होता. त्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणीच्या कामांना गती दिली. त्यानंतर वेळोवेळी पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली. परंतु, सोयाबीन फुलावर असता जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला. शिवाय परतीच्या पावसानेही दगा दिल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पदकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. दिवाळी पूर्वी उत्पादन हाती येत असल्याने सोयाबीनच्या लागवडीला यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. परंतु, अरेखच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने उत्पादनातही घट आल्याचे शेतकरी सांगतात. उत्पादन खर्च व सोयाबीनला मिळत असलेला दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने उत्पादन खर्चावर आधारीत भाव सोयाबीनला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १ आॅक्टोबर पासून सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली असून त्या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २१ हजार क्विंटल सोयाबीन तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत १ लाख ६४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतमाल शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला आहे.शेतमाल तारणाचा लाभ १०७ शेतकऱ्यांनाआर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना फायद्याची ठरणारी आहे. सात हजार क्विंटल सोयाबीन साठविण्याची क्षमता असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७ शेतकºयांनी २ हजार क्विंटल सोयाबीन तारण योजनेत ठेवले आहे.तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेवून सुमारे २ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. या शेतकºयांना सदर शेतमालाच्या मुळ किंमतीपैकी ७० टक्के रक्कम तात्काळ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड