शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

१.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:17 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देदोन कृऊबातील महिन्याभऱ्याची स्थिती : शेतमाल तारण योजना ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे. मागील एक महिन्यात हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी कशी करावी असाच प्रश्न शेतकºयांसमोर होता. त्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणीच्या कामांना गती दिली. त्यानंतर वेळोवेळी पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली. परंतु, सोयाबीन फुलावर असता जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला. शिवाय परतीच्या पावसानेही दगा दिल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पदकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. दिवाळी पूर्वी उत्पादन हाती येत असल्याने सोयाबीनच्या लागवडीला यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. परंतु, अरेखच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने उत्पादनातही घट आल्याचे शेतकरी सांगतात. उत्पादन खर्च व सोयाबीनला मिळत असलेला दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने उत्पादन खर्चावर आधारीत भाव सोयाबीनला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १ आॅक्टोबर पासून सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली असून त्या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २१ हजार क्विंटल सोयाबीन तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत १ लाख ६४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतमाल शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला आहे.शेतमाल तारणाचा लाभ १०७ शेतकऱ्यांनाआर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना फायद्याची ठरणारी आहे. सात हजार क्विंटल सोयाबीन साठविण्याची क्षमता असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७ शेतकºयांनी २ हजार क्विंटल सोयाबीन तारण योजनेत ठेवले आहे.तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेवून सुमारे २ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. या शेतकºयांना सदर शेतमालाच्या मुळ किंमतीपैकी ७० टक्के रक्कम तात्काळ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड