शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

१.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 22:17 IST

शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे.

ठळक मुद्देदोन कृऊबातील महिन्याभऱ्याची स्थिती : शेतमाल तारण योजना ठरतेय फायद्याची

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांसाठी दिवाळी बोनस अशी ओळख असलेल्या सोयाबीन पिकाचे यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे पाहिजे तसे उतारेच आले नाही. जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ५ पोते सोयाबीन झाल्याचे बोलले जात आहे. असे असतानाही शासनाच्या खरेदी केंद्रासह खासगी व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही सोयाबीनला दिल्या जात नसल्याची ओरड होत आहे. मागील एक महिन्यात हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १.८५ लाख क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.यंदाच्या वर्षी सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणी कशी करावी असाच प्रश्न शेतकºयांसमोर होता. त्यानंतर थोडाफार पाऊस झाल्याने शेतकºयांनी पेरणीच्या कामांना गती दिली. त्यानंतर वेळोवेळी पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली. परंतु, सोयाबीन फुलावर असता जिल्ह्यातून पाऊस बेपत्ता झाला. शिवाय परतीच्या पावसानेही दगा दिल्याने पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पदकांना चांगलाच फटका सहन करावा लागला आहे. दिवाळी पूर्वी उत्पादन हाती येत असल्याने सोयाबीनच्या लागवडीला यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. परंतु, अरेखच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्याने उत्पादनातही घट आल्याचे शेतकरी सांगतात. उत्पादन खर्च व सोयाबीनला मिळत असलेला दर यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याने उत्पादन खर्चावर आधारीत भाव सोयाबीनला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत १ आॅक्टोबर पासून सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली असून त्या महिन्याच्या अखेरपर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे २१ हजार क्विंटल सोयाबीन तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत १ लाख ६४ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी शेतमाल शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला आहे.शेतमाल तारणाचा लाभ १०७ शेतकऱ्यांनाआर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना फायद्याची ठरणारी आहे. सात हजार क्विंटल सोयाबीन साठविण्याची क्षमता असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत ५७ शेतकºयांनी २ हजार क्विंटल सोयाबीन तारण योजनेत ठेवले आहे.तर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत ५० शेतकऱ्यांनी तारण योजनेचा लाभ घेवून सुमारे २ हजार क्विंटल सोयाबीन ठेवले आहे. या शेतकºयांना सदर शेतमालाच्या मुळ किंमतीपैकी ७० टक्के रक्कम तात्काळ देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड