शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे.

ठळक मुद्देवाहतुकीला सुरुवात : तीन महिन्यांच्या नियतनाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनामुळे गोरगरिबांना तीन महिन्यांचे धान्य नियतन एकाच वेळी मंजूर करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मागणी केली होती. जिल्ह्याला तीन महिन्यांसाठी जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य नियतन मंजूर झाले आहेत. येत्या एक एप्रिलपासून संबंधीत दुकानदारांना तीन महिन्यांचे नियतन धान्य देण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ केला आहे. त्यामुळे सगळीकडे जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. गावखेड्यात हीच परिस्थिती आहे. अशातच हाताला काम नसल्याने मजूर तसेच गोरगरिबांची अडचण होण्याची शक्यता आहे. धान्याच्या तुटवड्यामुळे कोणालाही अडचण जाणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. जिल्ह्याला तीन महिन्यांचे नियोजन एकाच वेळी मंजूर करण्यात आले आहे. शासनाकडून पुरवठाही सुरू झाला आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीसाठी अधिक वाहने लावून दुकानापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था पुरवठा विभागामार्फत करण्यात आली आहे.दररोजचे नियतन ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. यात बहुतांश गहू आणि तांदूळ याचा समावेश आहे. लॉकडाउन असल्याने एकाच वेळी तीन महिन्यांचे जवळपास १८ हजार मेट्रिक टन धान्य मंजूर करण्यात आले आहे. दुकानदारांनी एकाच वेळी धान्य पुरवठा करताना दोन ग्रहकांमधील अंतर एक मीटर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणत्याही लाभार्थ्यांचे थम घ्यायचे नाहीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुकानदारांनी आपल्या आयडीवरून पावती द्यावी लागणार आहे. धान्य खरेदीसाठी आलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, त्यासाठी सॅनिटायझर, मास्कची व्यवस्था संबंधित ठिकाणी करावी लागणार आहे.दररोज ४०० ते ४५० मेट्रिक टन धान्याची उचल होत आहे. सध्या दीड महिना पुरेल ऐवढे ४ हजार ९६७ मेट्रिक टन नियतन धान्य शिल्लक आहे. येत्या १ एप्रिलपासून संबंधित दुकानदारांना नियतन तीन महिन्यांचे धान्य देण्यात येणार आहे.रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस