शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

१७ हजार ग्रामीण कुटुंबांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:18 IST

शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा प्रकार : पाण्यासाठी लावले शहरी दर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहराशेजारच्या पिपरी (मेघे) सह इतर ११ ग्रामपंचायत परिसरातील रहिवाशांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु, सध्या सदर ग्रामीण भागातील १७ हजार कुटुंबियांवर पाणीपट्टी कर घेताना शहरी दर थोपवून त्याची वसूली केली जात आहे. एका सुजान नागरिकांने त्या विरोधात राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागीतल्यावर त्याच्या पाणी पट्टीकरात सुधारणा करण्यात आली. शिवाय त्याच्याकडून सध्या ग्रामीण कर लावून पाणीपट्टी कर वसूल केला जात आहे. परंतु, इतर नागरिकांकडून शहरी दरातच सदर कर घेतल्या जात असल्याने या प्रकरणी योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा शहराशेजारच्या १३ ग्रा.पं. करिता वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे कार्यान्वीत आहे. शिवाय सदर ग्रा.पं.तील रहिवाशांकडून पाणीपट्टी कर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वसूल करते. पाणीपट्टी कराचे शहरीकरिता आणि ग्रामीण करिता वेगवेळे दर असताना सध्या वर्धा शहराशेजारी असलेल्या या १३ ग्रा.पं.तील सुमारे १७ हजार कुटुंबियांकडून शहरी दरात पाणीपट्टी कर वसूल केला जात आहे. आपण ग्रामीण भागातील रहिवासी असल्याने आपल्याकडून ग्रामीण दरातच पाणीपट्टी कर घेतल्या गेला पाहिजे.शहरी दरात घेतल्या जात असलेला पाणी पट्टीकर अन्याकारक आणि आर्थिक पिळवणूक करणारा असल्याने पिपरी (मेघे) येथील वासूदेव पांडुरंग राठोड यांनी राष्ट्रीय ग्राहक आयोगात दाद मागीतली. राष्ट्रीय ग्राहक आयोगानेही दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून राठोड यांच्या बाजूने निर्णय दिला. सदर निर्णयाच्या अनुषंगाने राठोड यांच्या पाणीपट्टीच्या देयकात सुधारणा करण्यात आली आहे. परंतु, वर्धा शहराशेजारच्या इतर १३ ग्रा.पं.तील रहिवाशांकडून सध्या शहरी दरातच पाणीपट्टीकर जीवन प्राधिकरण घेत आहे. हा प्रकार ग्रामीण भागातील रहिवाशांची आर्थिक पिळवणूक करणारा असल्याने या प्रकरणी झटपट योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आहे.आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रारमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण सध्या मनमर्जीनेच धोरण राबवित आहे. त्यांचा हा प्रकार ग्रामीण भागातील रहिवाशांच्या अडचणीत भर टाकणारा असल्याने या प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.पिपरी (मेघे) येथील वासूदेव राठोड यांच्याप्रमाणे सर्वांना पाण्याची सारखी देयके महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने द्यावी. ही ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. शहरी दर आकारने ही बाब अन्यायकारकच म्हणावी लागेल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडून वासूदेव राठोड यांच्या बाजूने संपूर्ण निकाल लागलेला नाही. ते पाणीपट्टी कर भरण्यास तयार नसल्याचे लक्षात आल्यावर निकाल लागेपर्यंत त्यांच्या पाणीपट्टी कराच्या दरात सुधारणा करण्याचे सूचना होत्या. त्या अनुषंगाने आम्ही ती कार्यवाही केली. वास्तविक पाहता हे प्रकरण राष्ट्रीय ग्राहक आयोगाने जिल्हा ग्राहक मंचाकडे पूर्णरविचारासाठी पाठविले आहे. २०११ मध्ये आम्ही हारल्याने हे प्रकरण राज्यापर्यंत पोहोचले होते. तेथे ते खारिज झाल्याने राष्ट्रीय ग्राहक आयोगापर्यंत पोहोचले.- विलास उमाळे, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई