शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात

By admin | Updated: October 13, 2016 01:15 IST

निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे.

पुनर्वसनाची व्यथा : महावितरण व प्रकल्प विभागाचे दुर्लक्षआष्टी (शहीद) : निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे. विद्युत वितरण कंपनीची वीज प्रवाहित लाईनही धरणाच्या पाण्यात बुडाली आहे. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावठाणाच्या सभोवताल १७ जिवंत खांब अद्याप अन्यत्र हलविले नाही. यामुळे धोक्याची शक्यता बळावली आहे.अहिरवाडा गावाचे ५० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. उर्वरित ग्रामस्थांना शासनाकडून वाढीव मोबदला मिळण्याची आशा आहे. पूर्वी मिळालेली तुटपूंजी रक्कम खर्च झाल्याने आता घराचे बांधकाम करण्यासाठी बाधित कुटुंबांकडे पैसे नाहीत. यामुळे नाईलाजास्तव जुन्याच गावात राहावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या वीज पुरवठ्याचे खांब पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुटुंबांचे शासनाने त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. वीजसेवा ही प्राथमिक गरज आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते; पण जुने वीज पुरवठ्याचे खांब धरणाच्या पाण्यात बुडाले असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या १७ खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खांब पाण्यात असल्याची माहिती वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू, असे म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. धरणाच्या पाण्यात गावातील लहान मुले पोहायला जातात. गुरांना पाणी पिण्याकरिता घेऊन जावे लागते. महिला कपडे धुण्यासाठी जातात. अशावेळी पाण्यााध्ये वीज प्रवाह संचारल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. गत कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी बाब असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार करीत पाण्यातील १७ खांबांवरील वीज पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)