शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात

By admin | Updated: October 13, 2016 01:15 IST

निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे.

पुनर्वसनाची व्यथा : महावितरण व प्रकल्प विभागाचे दुर्लक्षआष्टी (शहीद) : निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे. विद्युत वितरण कंपनीची वीज प्रवाहित लाईनही धरणाच्या पाण्यात बुडाली आहे. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावठाणाच्या सभोवताल १७ जिवंत खांब अद्याप अन्यत्र हलविले नाही. यामुळे धोक्याची शक्यता बळावली आहे.अहिरवाडा गावाचे ५० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. उर्वरित ग्रामस्थांना शासनाकडून वाढीव मोबदला मिळण्याची आशा आहे. पूर्वी मिळालेली तुटपूंजी रक्कम खर्च झाल्याने आता घराचे बांधकाम करण्यासाठी बाधित कुटुंबांकडे पैसे नाहीत. यामुळे नाईलाजास्तव जुन्याच गावात राहावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या वीज पुरवठ्याचे खांब पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुटुंबांचे शासनाने त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. वीजसेवा ही प्राथमिक गरज आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते; पण जुने वीज पुरवठ्याचे खांब धरणाच्या पाण्यात बुडाले असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या १७ खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खांब पाण्यात असल्याची माहिती वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू, असे म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. धरणाच्या पाण्यात गावातील लहान मुले पोहायला जातात. गुरांना पाणी पिण्याकरिता घेऊन जावे लागते. महिला कपडे धुण्यासाठी जातात. अशावेळी पाण्यााध्ये वीज प्रवाह संचारल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. गत कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी बाब असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार करीत पाण्यातील १७ खांबांवरील वीज पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)