शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

१७ विद्युत प्रवाहित खांब धरणाच्या पाण्यात

By admin | Updated: October 13, 2016 01:15 IST

निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे.

पुनर्वसनाची व्यथा : महावितरण व प्रकल्प विभागाचे दुर्लक्षआष्टी (शहीद) : निम्न वर्धा प्रकल्प विभागाने अत्यल्प मोबदला दिल्याने पुनर्वसनापासून वंचित असलेल्या प्रकल्पबाधित कुटुंबांचा मुक्काम बुडित गावठाणातच आहे. विद्युत वितरण कंपनीची वीज प्रवाहित लाईनही धरणाच्या पाण्यात बुडाली आहे. आर्वी तालुक्यातील अहिरवाडा गावठाणाच्या सभोवताल १७ जिवंत खांब अद्याप अन्यत्र हलविले नाही. यामुळे धोक्याची शक्यता बळावली आहे.अहिरवाडा गावाचे ५० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले. उर्वरित ग्रामस्थांना शासनाकडून वाढीव मोबदला मिळण्याची आशा आहे. पूर्वी मिळालेली तुटपूंजी रक्कम खर्च झाल्याने आता घराचे बांधकाम करण्यासाठी बाधित कुटुंबांकडे पैसे नाहीत. यामुळे नाईलाजास्तव जुन्याच गावात राहावे लागत आहे. येथे सुरू असलेल्या वीज पुरवठ्याचे खांब पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कुटुंबांचे शासनाने त्वरित पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. वीजसेवा ही प्राथमिक गरज आहे. शासनाने प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के पुनर्वसन होईपर्यंत पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे होते; पण जुने वीज पुरवठ्याचे खांब धरणाच्या पाण्यात बुडाले असताना जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या १७ खांबांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वीज खांब पाण्यात असल्याची माहिती वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करू, असे म्हणून अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली आहे. धरणाच्या पाण्यात गावातील लहान मुले पोहायला जातात. गुरांना पाणी पिण्याकरिता घेऊन जावे लागते. महिला कपडे धुण्यासाठी जातात. अशावेळी पाण्यााध्ये वीज प्रवाह संचारल्यास जीवित हानी होण्याची शक्यता आहे. गत कित्येक वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना लोकप्रतिनिधीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या जीवावर बेतणारी बाब असतानाही दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी विचार करीत पाण्यातील १७ खांबांवरील वीज पुरवठा बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)