शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
5
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
6
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
7
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
8
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
9
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
10
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
11
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
12
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
13
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
14
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
15
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
16
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
17
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
18
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
19
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
20
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश

16 नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार 11.67 लाखांची शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 

ठळक मुद्देवीज पडल्याने झाले होते मोठे नुकसान : जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांकडे निधी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यंतरी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तब्बल १५ जनावरे तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. वारसदारांना व पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजारांची शासकीय मदत मंजूर झाली असून, ती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेला हा जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळणार आहे. सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. वर्धा तालुक्यात वीज पडून एका जनावराचा, सेलू तालुक्यात तीन, देवळी व आर्वी तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात चार, तर समुद्रपूर तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला. या सर्व पशुपालकांना शासकीय मदत मिळावी म्हणून पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ३६ लाख ७ हजारांचा निधीही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय आर्थिक मदत मिळणार आहे. हवालदिल कुटुंबियांसाठी शासनाची ही मदत मनोधैर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे. 

त्या जखमीच्या प्रस्तावावर वेळीच होणार विचार- वीज पडल्याने कारंजा तालुक्यातील दानापूर येथील विश्वेश्वर आनंद काळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद महसूल विभागाने घेतली असून जखमी काळे यांना शासकीय मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. आवश्यक कार्यवाही केल्यानंतरच या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार आहे.

वीज पडून दाेन मनुष्यांचा तर १५ जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. तो तालुकास्तरावर वळता करण्यात आला आहे. लवकच नुकसानग्रस्तांना तो वितरीत करण्यात येईल.- अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना