शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
3
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
4
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
5
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
6
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
7
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
8
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
9
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
10
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
11
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
12
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
13
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
14
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
15
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
17
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
18
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
19
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
20
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस

16 नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळणार 11.67 लाखांची शासकीय मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 05:00 IST

सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. 

ठळक मुद्देवीज पडल्याने झाले होते मोठे नुकसान : जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यांकडे निधी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मध्यंतरी वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून तब्बल १५ जनावरे तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. वारसदारांना व पशुपालकांसाठी ११ लाख ६७ हजारांची शासकीय मदत मंजूर झाली असून, ती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेला हा जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबांना भरीव आर्थिक मदत मिळणार आहे. सेलू तालुक्यातील सालई (कला) येथील ललिता शेषराव उईके व देवळी तालुक्यातील रत्नापूर येथील रामा पांडुरंग मांगळूकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. सदर घटना उघडकीस येताच या दोन्ही कुटुंबांना शासकीय मदत मिळावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आला. शासनाने या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठीचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. वर्धा तालुक्यात वीज पडून एका जनावराचा, सेलू तालुक्यात तीन, देवळी व आर्वी तालुक्यात प्रत्येकी एक, हिंगणघाट तालुक्यात चार, तर समुद्रपूर तालुक्यात पाच जनावरांचा मृत्यू झाला. या सर्व पशुपालकांना शासकीय मदत मिळावी म्हणून पाठविण्यात आलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे. त्यासाठी ३६ लाख ७ हजारांचा निधीही जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाकडे वळता केला आहे. त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय आर्थिक मदत मिळणार आहे. हवालदिल कुटुंबियांसाठी शासनाची ही मदत मनोधैर्य वाढविण्यासाठी महत्त्वाचीच ठरणार आहे. 

त्या जखमीच्या प्रस्तावावर वेळीच होणार विचार- वीज पडल्याने कारंजा तालुक्यातील दानापूर येथील विश्वेश्वर आनंद काळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद महसूल विभागाने घेतली असून जखमी काळे यांना शासकीय मदत देण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. आवश्यक कार्यवाही केल्यानंतरच या कुटुंबाला शासकीय मदत मिळणार आहे.

वीज पडून दाेन मनुष्यांचा तर १५ जनावरांचा मृत्यू झाला. या नुकसानग्रस्त कुटुंबांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. तो तालुकास्तरावर वळता करण्यात आला आहे. लवकच नुकसानग्रस्तांना तो वितरीत करण्यात येईल.- अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :government schemeसरकारी योजना