शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

154 लोकांना सुरक्षित स्थळी हलविले, पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:49 IST

जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला

वर्धा :- जिल्ह्यात काल 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात नदीनाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला तर 154 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुक्यात पुरात अडकलेल्या 15 लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली.समुद्रपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मारडा, उमरी, गोविंदपूर, डोंगरगाव येथे पुलावरून पाणी वाहत आल्यामुळे या गावांचा संपर्क तुटला. तसेच वाघेडा नाल्याला पूर आल्यामुळे समुद्रपूर -वर्धा रस्ता बंद आहे. तसेच हिंगणघाट तालुक्यात किणगाव, पारडी, लाडकी, सोनेगाव(धोटे), दोंदुडा , येनोरा, बांबरडा, चिंचोली या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. तसेच सेलू तालुक्यात सिंदी रेल्वे या गावाचा संपर्क तुटला. गावात पाणी शिरल्यामुळे गावातील 50 लोकांना नेहरू विद्यालयात हलविण्यात आले. याशिवाय हमदापूर 16, दहेगाव 50 आणि सेलूमध्ये 77 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. नांद धरणाचे 6 गेट 25 सेमी उघडण्यात आले असून, 163. 75 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वडगाव धरणाचे 13 गेट उघडण्यात आले आहेत. वना नदीत 289.83 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.