शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

१५०० शेतकरी तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे.

ठळक मुद्दे२ लाख २३ हजार कुटुंबीयांचा सर्व्हे : ४०३ मध्यम, ६१४ तीव्र तणावग्रस्त

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेती व्यवसाय हा बेभरवशाचा झाल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला गेला आहे. अनेक शेतकरी कुटुंबीय पतसंस्था तसेच खासगी सावकारांचे कर्जबाजारी झाले आहेत. सततच्या दुष्काळामुळे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबप्रमुख तणावात जीवन जगत आहेत. अशा कुटुंबीयांचे प्रेरणा प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये जिल्ह्यातील आठ तालुक्यातील १ हजार ५१० कुटुंबप्रमुख तणावपूर्ण आयुष्य जगत असल्याची माहिती समोर आली. यातील ४८९ सौम्य, ४०३ मध्यम तर ६१४ शेतकरी तीव्र तणावग्रस्त आहेत.प्रेरणा प्रकल्पांतर्गत एक हजार ३५ आशा वर्कर्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील २ लाख ५० हजार कुटुंबीयांचा सर्वे करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांचा समावेश आहे. वर्धा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंबप्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्कर्सच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वेक्षण करण्यात आले. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. यापैकी १६५ कुटुंबप्रमुख तणावात आयुष्य जगत आहेत. ३४ सौम्य आणि १३१ तीव्र स्वरूपातील तणावात आहेत. सेलू तालुक्यातील २९ हजार ५३७ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये २४६ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले. समुद्रपूर तालुक्यातील २९ हजार ३९९ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ४३ शेतकरी, कारंजा तालुक्यातील १८ हजार ९४८ पैकी ५४८ शेतकरी, देवळी तालुक्यातील २६ हजार ६०८ पैकी ३३५ शेतकरी, आर्वी तालुक्यातील २५ हजार ९७३ पैकी १२४, आष्टी तालुक्यातील १२ हजार ४२५ पैकी ३४ आणि हिंगणघाट तालुक्यातील २७ हजार २२३ कुटुंबापैकी १५ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. तणावाचे रुपांतर आत्महत्यांमध्ये होऊ नये, यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यात येत आहे.हमीभाव ठरू शकतो औषधोपचारतणावग्रस्त शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाल्यास कुटुंब तणावमुक्त होऊ शकतो. उत्पादन खर्चात नांगरणी, वखरणी, वेचणी, पेरणी, खत, बियाणे पेरणी खर्च, तणनाशक, फवारणी आदींसह बाजारपेठेत आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च मोठ्याप्रमाणावर होत आहे. परंतु, बाजारात त्याच्या मालाला कमी भाव आहे. त्यामुळे शेतीव्यवसाय तोट्यात आहे. राब-राब राबूनदेखील कष्टाचे फळ मिळत नसल्याने शेतकरी तणावाखाली वावरतात. शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. अशा विविध कारणांमुळे शेतकºयांचे खच्चीकरण होते, परिणामी तो तणावाखाली येतो.

टॅग्स :Farmerशेतकरी