शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:47 IST

पीएम विश्वकर्मा योजना : २२ प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसाहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे. आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे १८ बलुतेदार गावात होते. यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती. मात्र काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. 

आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली. त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबवायला सुरुवात केली आहे. आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ हजार रुपये देतात. इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता ३ लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांनी याचा लाभ घेतल आहे.

हे कारागीर योजनेचे लाभार्थी सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेबद्दल ठळक बाबी....

  • 'स्किल इंडिया' पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण 
  • कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक 
  • प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार 
  • प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये 
  • बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज

अर्जाकरिता या कागदपत्रांची आवश्यकताया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट छायाचित्र, बैंक पासबुक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा