शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा: राज ठाकरे
2
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
3
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
4
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
7
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
8
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
9
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
10
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
11
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
12
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
13
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
14
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
15
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
16
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
17
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
18
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
19
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
20
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?

व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:47 IST

पीएम विश्वकर्मा योजना : २२ प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसाहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे. आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे १८ बलुतेदार गावात होते. यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती. मात्र काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. 

आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली. त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबवायला सुरुवात केली आहे. आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ हजार रुपये देतात. इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता ३ लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांनी याचा लाभ घेतल आहे.

हे कारागीर योजनेचे लाभार्थी सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेबद्दल ठळक बाबी....

  • 'स्किल इंडिया' पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण 
  • कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक 
  • प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार 
  • प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये 
  • बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज

अर्जाकरिता या कागदपत्रांची आवश्यकताया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट छायाचित्र, बैंक पासबुक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा