शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर १५ हजार रुपये घ्या, वरून ३ लाखांचे कर्ज मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:47 IST

पीएम विश्वकर्मा योजना : २२ प्रकारच्या कारागिरांना मिळणार बँकेतून अर्थसाहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गावगाड्यातील कारभार आजही पारंपरिक व्यवसायावरच अवलंबून आहे. आधुनिकीकरणात या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी तीन लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध करून दिले जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करणारे आणि गावगाड्याची अर्थव्यवस्था चालविणारे १८ बलुतेदार गावात होते. यांना गावातच रोजगार मिळत असल्याने त्यांना शहरात येण्याची गरज नव्हती. मात्र काळाच्या ओघात अनेकांचे व्यवसाय बंद पडले. 

आधुनिकीकरणात या व्यवसायाचा टिकाव लागला नसल्याने त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली. त्यामुळे पुन्हा या व्यवसायांना नव्याने चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान विश्वकर्मा योजना देशभरात राबवायला सुरुवात केली आहे. आधी या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १५ हजार रुपये देतात. इतकेच नाही तर रोजगार उभारण्याकरिता ३ लाखांपर्यंत कर्जही उपलब्ध होत असल्याने त्याचा लाभ दिला जातो. आतापर्यंत जिल्ह्यात शेकडो कारागिरांनी याचा लाभ घेतल आहे.

हे कारागीर योजनेचे लाभार्थी सुतार, होडी बनविणारे, लोहार, घिसाडी, टोपली, चटई, झाडू बनविणारे, काथ्या विणकर, बाहुल्या व खेळणी बनविणारे पारंपरिक कारागीर, सोनार, कुंभार, चांभार, हातोडा व टूलकिट बनविणारे, कुलूप-किल्ली बनविणारे, मूर्तिकार, पाथरवट, दगडफोडे, गवंडी, न्हावी, फुलांचे हार बनविणारे, धोबी, शिंपी व मासे पकडण्याचे जाळे विणणारे कारागीरांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

योजनेबद्दल ठळक बाबी....

  • 'स्किल इंडिया' पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर ओळखपत्र मिळणार त्यानंतर प्रशिक्षण 
  • कारागिरांना पाच दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक 
  • प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपयांप्रमाणे स्टायफंड तथा शिष्यवृत्ती
  • प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर १५ हजार रुपये किंवा साहित्य किट मिळेल आणि त्यानंतर प्रमाणपत्र मिळणार 
  • प्रमाणपत्र जोडून बँकेकडे योजनेअंतर्गत करावी कर्जाची मागणी, सुरुवातीला मिळणार बिनव्याजी एक लाख रुपये 
  • बिनव्याजी कर्जाची वेळेत परतफेड केल्यास मिळणार पुढील दोन लाखांचे कर्ज

अर्जाकरिता या कागदपत्रांची आवश्यकताया योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, पासपोर्ट छायाचित्र, बैंक पासबुक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाwardha-acवर्धा