शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:19 IST

जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या रकमेची थकबाकी

आॅनलाईन लोकमतवर्धा  : जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी   महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ जाहीर करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या ६८ हजार आहे. यातील ९० टक्के शेतकरी महावितरणची देयके भरीत नाहीत.  महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि कृषी पंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा केला जातोे त्यापैकी ८५% रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील ३ वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलं नाही. पण थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ८५२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ६७. ७६ लाख रुपये, आष्टी उपविभागात १२९० कृषी पम्प वीज ग्राहकांनी १८.८४ लाख रुपये, कारंजा उपविभागात १५४३ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ५४ लाख रुपये, खरंगाना ( ग्रामीण)  उपविभागात ६१५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी २० लाख रुपये, पुलगाव (शहर) उपविभागात ९४२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १४ हजार रुपये, हिंगणघाट (शहर) उपविभागात ५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ११ हजार रुपये, हिंगणघाट उपविभागातील ३६९४ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ४ कोटी २२ लाख रुपये , समुद्रपूर उपविभातील २,२२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपये, देवळी  उपविभातील १५२९ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १ लक्ष रुपये, सेलू उपविभातील ८२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ९३ लाख रुपये, वर्धा उपविभागातील २२७१ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी ठेवली आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांस ३०,००० रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत ५ समान हप्त्यात ही रक्कम भरावी लागणार असून सोबत चालू देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. ३०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्यास १० सामान हप्ते मिळणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी सादर योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी