शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:19 IST

जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या रकमेची थकबाकी

आॅनलाईन लोकमतवर्धा  : जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी   महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ जाहीर करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या ६८ हजार आहे. यातील ९० टक्के शेतकरी महावितरणची देयके भरीत नाहीत.  महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि कृषी पंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा केला जातोे त्यापैकी ८५% रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील ३ वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलं नाही. पण थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ८५२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ६७. ७६ लाख रुपये, आष्टी उपविभागात १२९० कृषी पम्प वीज ग्राहकांनी १८.८४ लाख रुपये, कारंजा उपविभागात १५४३ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ५४ लाख रुपये, खरंगाना ( ग्रामीण)  उपविभागात ६१५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी २० लाख रुपये, पुलगाव (शहर) उपविभागात ९४२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १४ हजार रुपये, हिंगणघाट (शहर) उपविभागात ५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ११ हजार रुपये, हिंगणघाट उपविभागातील ३६९४ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ४ कोटी २२ लाख रुपये , समुद्रपूर उपविभातील २,२२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपये, देवळी  उपविभातील १५२९ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १ लक्ष रुपये, सेलू उपविभातील ८२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ९३ लाख रुपये, वर्धा उपविभागातील २२७१ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी ठेवली आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांस ३०,००० रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत ५ समान हप्त्यात ही रक्कम भरावी लागणार असून सोबत चालू देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. ३०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्यास १० सामान हप्ते मिळणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी सादर योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी