शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 15:19 IST

जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधींच्या रकमेची थकबाकी

आॅनलाईन लोकमतवर्धा  : जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी   महावितरणकडून मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना २०१७ जाहीर करण्यात आली आहे.वर्धा जिल्ह्यात शेती पंप धारकांची संख्या ६८ हजार आहे. यातील ९० टक्के शेतकरी महावितरणची देयके भरीत नाहीत.  महावितरणकडून घरगुती, वाणिज्य, औद्योगिक आणि कृषी पंप धारकांना वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून दरमहा जो महसूल गोळा केला जातोे त्यापैकी ८५% रक्कम वीज खरेदीवर खर्च होते. मागील ३ वर्षात राज्यात एकही थकबाकीदार शेतकऱ्याचा कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलं नाही. पण थकबाकीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने महावितरण समोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे.वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ८५२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ६७. ७६ लाख रुपये, आष्टी उपविभागात १२९० कृषी पम्प वीज ग्राहकांनी १८.८४ लाख रुपये, कारंजा उपविभागात १५४३ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ५४ लाख रुपये, खरंगाना ( ग्रामीण)  उपविभागात ६१५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी २० लाख रुपये, पुलगाव (शहर) उपविभागात ९४२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १४ हजार रुपये, हिंगणघाट (शहर) उपविभागात ५ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ११ हजार रुपये, हिंगणघाट उपविभागातील ३६९४ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ४ कोटी २२ लाख रुपये , समुद्रपूर उपविभातील २,२२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ८६ लाख रुपये, देवळी  उपविभातील १५२९ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी १ लक्ष रुपये, सेलू उपविभातील ८२२ कृषी पम्प वीज ग्राहकांनी ९३ लाख रुपये, वर्धा उपविभागातील २२७१ कृषी पम्प वीज ग्राहकांनी १ कोटी ९४ लाख रुपये थकबाकी ठेवली आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ मध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांस ३०,००० रुपयांपर्यंत थकबाकी असल्यास डिसेंबर २०१८ पर्यंत ५ समान हप्त्यात ही रक्कम भरावी लागणार असून सोबत चालू देयकाचा भरणा करणे आवश्यक आहे. ३०,००० रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असल्यास १० सामान हप्ते मिळणार आहेत. जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकºयांनी सादर योजनेत सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी