शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

१५ जुलैनंतर वर्धेत पाणी पेटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 22:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात ...

ठळक मुद्दे‘धाम’ मध्ये केवळ नाममात्र जलसाठा : आकाशाकडे साऱ्यांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांची पाणी समस्या निकाली काढण्यासाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पात सध्या केवळ नाममात्र मृत जलसाठा आहे. या जलसाठ्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्याचा केवळ १५ जुलैपर्यंत नागरिकांना पुरवठा केल्या जाऊ शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वीच पाऊस लांबला गेल्याने आणि आणखी काही दिवस हीच परिस्थिती राहत दमदार पाऊस न झाल्यास वर्धा शहरासह परिसरातील १३ गावांत पाणी समस्या पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पात ३२८.६०० दलघमी पाणी साठविल्या जाऊ शकते. परंतु, मागील दोन वर्षात दमदार पाऊस जिल्ह्यात न झाल्याने हा प्रकल्प पाहिजे त्या प्रमाणात भरला नाही. शिवाय जेव्हा हा प्रकल्प तयार करण्यात आला तेव्हापासून या प्रकल्पातून एक ट्रॉलीही गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाणी साठवण क्षमता कमीच झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशातच यंदा या प्रकल्पाला गाळमुक्त करण्याचा विडा जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाने उचलला असता तरी मागील १ महिना २३ दिवसात केवळ ४० हजार घ.मी. गाळ काढण्यात आला आहे. वास्तविक पाहता या प्रकल्पात सुमारे ५ लाख घ.मी. गाळ असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांचा आहे. तर याच प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. प्रशासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग करून पाण्याचा पुरवठा नागरिकांना करते. मात्र, सध्या स्थितीत या प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपला असून सध्या मृत जलसाठ्याची उचल केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा पाटबंधारे विभागाने वर्धा शहर व परिसरातील १३ गावांमधील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची मागणी लक्षात घेऊन प्रकल्पातील पाणी सोडले होते. त्यामुळे सध्या या प्रकल्पातील मृत जलसाठ्यात किमान एक ते दीड मिटरने घट झाल्याचे वास्तव आहे. तर सध्या असलेल्या मृत साठ्यापैकी जास्तीत जास्त ३ दलघमी पाण्याची उचल करता येईल. शिवाय ते पाणी नागरिकांना १५ जुलैपर्यंत देता येईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे. मात्र, येत्या काही दिवसात दमदार पाऊस होत धाम नदी दुथडी भरून न वाहिल्यास तसेच धाम प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ न झाल्यास जुलै महिन्याच्या तिसºया आठवड्यापासून भीषण पाणी समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.गाळ नेण्याकडे शेतकऱ्यांची पाठधाम प्रकल्पातून काढण्यात येणारा गाळ शेतकऱ्यांनी नि:शुल्क न्यावा, असे आवाहन कृषी विभागासह महसूल विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे. परंतु, सदर गाळ शेतापर्यंत नेण्यासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने आणि तो या भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने कुणीही शेतकरी गाळ नेण्यासाठी पसंदी दर्शवित नसल्याचे चित्र या परिसरात बघावयास मिळत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी योग्य पाऊल उचलत धाम प्रकल्प गाळमुक्त करून या भागातील शेतशिवार गाळयुक्त करावे, अशी मागणी आहे.