शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

शेतकऱ्यांचा शासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By admin | Updated: April 14, 2016 02:43 IST

थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.

टालाटुले प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयातच काढली रात्रवर्धा : थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. रात्री उशिरापर्यंत निर्णय न झाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रात्र काढली. बुधवारी शासनाला कर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची मुदत देत आंदोलन मागे घेण्यात आले. २६ एप्रिलपर्यंत रकमेचे वाटप सुरू न झाल्यास खासदार व आमदारांच्या घरी ताट-वाटी आंदोलन केले जाईल, असा इशारा बुधवारी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगचे सुनील टालाटुले यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश होते; पण सोमवारी न्यायालयाने तात्पूरती स्थगिती दिली. यामुळे दुसरा पर्याय म्हणून शासनाने पणन महासंघामार्फत कृउबासला कर्ज द्यावे, या मागणीसाठी किसान अधिकारचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्याने आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच रात्र काढावी लागली. दरम्यान, मुंबई येथे खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पणन मंत्री पाटील यांना निवेदन व कृउबासचा ठराव देण्यात आला. पाटील यांनी कर्जाबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सचिवांना दिल्याची माहिती दिली.टालाटुलेला हैसियत प्रमाणपत्र देऊ नयेउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे लवाद प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका टालाटुले यांनी २ नोव्हेंबर २०१५ ला दाखल केली होती. यावर न्यायाधीशांनी त्यांना ४ कोटी ४० लाख ९८ हजार २६३ रुपये व १२ टक्के व्याज एवढी रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले; पण ती रक्कम जमा करण्याची ऐपत नसल्याचे सांगून हैसियत प्रमाणपत्र सादर करतो, असे टालाटुले यांनी न्यायालयाला कळविले. यासाठी ६ एप्रिलपर्यंत मुदत होती; पण ती वाढवून तीन आठवड्याचा कालावधी मागितला. यावर न्यायाधीशांनी दोन आठवडे दिलेत. यामुळेच लिलाव स्थगित झाला. हैसियत प्रमाणपत्रासाठी टालाटुले यांनी अर्ज केला आहे. त्यांना हैसियत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणीही किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दोन्ही आमदारांची सहकार मंत्र्यांशी चर्चा सेलू तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये थकविणारे श्रीकृष्ण जिनींग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत व पीडित शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याबाबत बुधवारी वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर व हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. यावर लवकरच शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.सुमारे ५०० शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगला कापूस विकला; पण खरेदी केलेल्या कापसाचे तब्बल ८ कोटी रुपये देण्यास टालाटुले यांनी टाळाटाळ केली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाने टालाटुले यांची स्थावर व जंगम मालमत्ता लिलाव करण्याची घोषणा केली. प्रशासनाने सर्व कारवाई केली; पण टालाटुले यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कारवाई टळली.