शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शेतकऱ्यांचा शासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम

By admin | Updated: April 14, 2016 02:43 IST

थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता.

टालाटुले प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयातच काढली रात्रवर्धा : थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. रात्री उशिरापर्यंत निर्णय न झाल्याने आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच रात्र काढली. बुधवारी शासनाला कर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची मुदत देत आंदोलन मागे घेण्यात आले. २६ एप्रिलपर्यंत रकमेचे वाटप सुरू न झाल्यास खासदार व आमदारांच्या घरी ताट-वाटी आंदोलन केले जाईल, असा इशारा बुधवारी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. श्रीकृष्ण जिनिंग प्रेसींगचे सुनील टालाटुले यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचे आदेश होते; पण सोमवारी न्यायालयाने तात्पूरती स्थगिती दिली. यामुळे दुसरा पर्याय म्हणून शासनाने पणन महासंघामार्फत कृउबासला कर्ज द्यावे, या मागणीसाठी किसान अधिकारचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कुठलाही निर्णय न झाल्याने आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच रात्र काढावी लागली. दरम्यान, मुंबई येथे खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. पणन मंत्री पाटील यांना निवेदन व कृउबासचा ठराव देण्यात आला. पाटील यांनी कर्जाबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सचिवांना दिल्याची माहिती दिली.टालाटुलेला हैसियत प्रमाणपत्र देऊ नयेउच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे लवाद प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका टालाटुले यांनी २ नोव्हेंबर २०१५ ला दाखल केली होती. यावर न्यायाधीशांनी त्यांना ४ कोटी ४० लाख ९८ हजार २६३ रुपये व १२ टक्के व्याज एवढी रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश दिले; पण ती रक्कम जमा करण्याची ऐपत नसल्याचे सांगून हैसियत प्रमाणपत्र सादर करतो, असे टालाटुले यांनी न्यायालयाला कळविले. यासाठी ६ एप्रिलपर्यंत मुदत होती; पण ती वाढवून तीन आठवड्याचा कालावधी मागितला. यावर न्यायाधीशांनी दोन आठवडे दिलेत. यामुळेच लिलाव स्थगित झाला. हैसियत प्रमाणपत्रासाठी टालाटुले यांनी अर्ज केला आहे. त्यांना हैसियत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी मागणीही किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.दोन्ही आमदारांची सहकार मंत्र्यांशी चर्चा सेलू तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांचे ८ कोटी रुपये थकविणारे श्रीकृष्ण जिनींग प्रेसिंगचे मालक सुनील टालाटुले यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत व पीडित शेतकऱ्यांना त्वरित न्याय देण्याबाबत बुधवारी वर्धेचे आ.डॉ. पंकज भोयर व हिंगणघाटचे आ. समीर कुणावार यांनी राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली. यावर लवकरच शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.सुमारे ५०० शेतकऱ्यांनी श्रीकृष्ण जिनिंग प्रेसिंगला कापूस विकला; पण खरेदी केलेल्या कापसाचे तब्बल ८ कोटी रुपये देण्यास टालाटुले यांनी टाळाटाळ केली. शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शासनाने टालाटुले यांची स्थावर व जंगम मालमत्ता लिलाव करण्याची घोषणा केली. प्रशासनाने सर्व कारवाई केली; पण टालाटुले यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कारवाई टळली.