शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

११२ बचत गटांना वऱ्हाड महोत्सवात देणार १५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे.

ठळक मुद्देसत्यजीत बढे : ८ ते १२ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवार ८ ते १२ जानेवारी या कालावधीत लोक महाविद्यालयाच्या मैदानावर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जि. प. यांच्या संयुक्त विद्यमाने वºहाड महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याच महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तब्बल ११२ महिला बचत गटांना सुमारे १५ कोटींच्या अर्थसहाय्याचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सत्यजीत बढे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.बढे पुढे म्हणाले, विभागस्तरीय असलेल्या या वऱ्हाड महोत्सवात एकूण १२६ महिला बचत गट सहभागी होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील १५, भंडारा १२, गडचिरोली १४, गोंदीया २०, चंद्रपूर १०, वर्धा ५५ तर बुलढाणा १ आणि जळगाव येथील दोन महिला बचत गट सहभागी होणार आहेत. महिलांना सक्षम करण्याचा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमही याप्रसंगी पार पडणार आहे. सदर वºहाड महोत्सवाचे उद्घाटन नेमके कोण करणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी, आमदार, खासदार यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.स्वच्छ आणि निरोगी आरोग्याविषयी प्रभावी जनजगृती करण्याच्या उद्देशाने या महोत्सवात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाचा स्टॉल राहणार असल्याचेही सत्यजीत बढे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला महाराज्य राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या स्वाती वानखेडे यांची उपस्थिती होती.सेल्फी पॉर्इंट घालणार भूरळवऱ्हाड महोत्सवात विविध खाद्यपदार्थांची मेजवानी राहणार असून बच्चेकंपनींसह नागरिकांना भूरळ घालेल असा एक सेल्फी पॉर्इंट राहणार आहे. या महोत्सवाचा वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही सत्यवीर बढे यांनी यावेळी केले.