शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

सेवा व्यावसायिकांना १४४.३० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची उपासमार : आता सण, उत्सवांवरही संक्रांत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविड-१९ च्या प्रकोपामुळे गेल्या सहा महिन्यांपासून विवाह सोहळे, समारंभ आदी सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. परिणामी, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस व इलेक्ट्रिक यासह संबंधित इतर सेवा व्यवसायही ठप्प आहेत. त्यामुळे एकट्या वर्धा जिल्ह्यात १४४ कोटी ३० लाख रुपयांच्या फटक्याने अर्थचक्र प्रभावित झाले आहे.जिल्ह्यामध्ये मंगल कार्यालय, लॉन, कॅटरर्स, मंडप डेकोरेशन, साउंड सर्व्हिस, इलेक्ट्रिक व्यवसाय करणाऱ्यांची संख्या १ हजारावर आहे. दरवर्षी विवाह सोहळे, समारंभ यासह इतरही मोठ्या कार्यक्रमांतून या व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणामुळे या सर्व व्यवसायांवर संक्रांत आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून संचारबदी लागू असल्याने सामूहिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी विवाह सोहळे व समारंभाला मुकावे लागले तर आता सण, उत्सवाच्या आयोजनावरही मर्यादा घालण्यात आल्याने या सेवा व्यावसायिकांच्या संकटात आणखीच भर पडली आहे. विशेषत: या व्यवसायाशी संलग्न असलेले वाजंत्री, डोलीवाले, रांगोळी, फोटोग्राफर, ब्युटीपार्लर, वेटर, मोलकरीण, साफसफाई कर्मचारी आदींसह हजारोंचे रोजगार हिरावल्याने उपासमारीची वेळ आली आहे.अनेकांनी मोलमजुरीचा निवडला पर्यायजिल्ह्यातील सेवा व्यावसायिकांपैकी ७५ टक्के व्यावसायिक हे ग्रामीण भागातील असून त्यांनी या व्यवसायातून स्वयंरोजगार उभारला आहे. ते स्वत: मंडप डेकोरेशन, साऊंड सर्व्हिस, इलेक्ट्रिकचे काम करतात. खड्डा खोदण्यापासून तर बल्ली गाडून पडदा लावण्याचेही काम ते स्वत: करीत असल्याने या लॉकडाऊनच्या काळात त्यांचास्वयंरोजगारच ठप्प पडला आहे. याचाच परिणाम या व्यवसायातील मजुरांवरही झाला आहे. मंडप कारागीर आणि या व्यावसायिकांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अनेकांना मोलमजुरी करावी लागत आहे.सेवा व्यावसायिकनिहाय झालेले नुकसानकोरोना विषाणू संसर्गामुळे जिल्ह्यात १ हजारावर असलेल्या सेवा व्यावसायिकांचे यंदा जवळपास दीडशे कोटींचे नुकसान झाले आहे. अनेकांनी व्यवसायाकरिता कर्ज घेतले असून त्यांचे हप्ते थकल्याने बँकांकडून नोटीस येत आहेत. शासनाच्या आदेशाने हप्ते थांबविण्यात आले असून व्याज मात्र, सुरूच आहे. या काळात व्याजाचेही चक्र जोरात असल्याने मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषत: या व्यवसायावर अवलंबून असणाºया इतर दुर्लक्षित कामगारांचा पोटमारा झाला आहे. ग्रामीण भागात या व्यवसायाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारणाऱ्यांची मोठी वाताहत झाली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.संजय ठाकरे, सचिव, वर्धा सेवा समिती.