शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

‘त्या’ १३ गावांचा होणार विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:56 IST

शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देप्राकलन तयार होतेय कासवगतीने : महाकाळी ते येळाकेळी भूमिगत जलवाहिनी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या हे काम कासवगतीने होत असून महाकाळी ते येळाकेळी यादरम्यानच्या १३ गावांनाही पाणी कसे देता येईल, याविषयीचा विचार सध्या केला जात आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल येळाकेळी व पवनार येथून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. त्यानंतर सदर पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा सुमारे ३६ हजारांच्या वर कुटुंबीयांना केला जातो. परंतु, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा धाम प्रकल्पातही पुरेसा जलसाठा नव्हता. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांवरून वर्धा पाटबंधारे विभागाने केल्याने नागरिकांनाही पिण्या योग्य पाणी मिळाले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्याच्या विषयावर १४ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत पालक सचिव चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राकलन तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मजीप्राने सर्वेक्षण केले. परंतु, प्रकलनाला अंतिम रूप अद्याप देण्यात आलेले नाही.२६ कि.मी. टाकावी लागणार जलवाहिनीमहाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्यासाठी २६ किमीची जलवाहिनी टाकावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.महिना लोटला; अधीक्षकांकडून दखल नाहीमहाकाळी ते येळाकेळीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकून धाम नदीचे पाणी वर्धेपर्यंत आणण्यासाठी प्राकलन तयार करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरच्याच अधीक्षक अभियंत्यांना १६ मे २०१९ ला एक पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले आहे. हे पत्र पाठवून महिना लोटला असून अद्याप वर्धा कार्यालयाला त्यावर उत्तर देण्यात आलेले नाही, हे विशेष.या गावांचा होतोय विचारआर्वी तालुक्यातील काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावध, सेलू तालुक्यातील खैरी, सुकळी, खेर्डा तर वर्धा तालुक्यातील मजरा, कामठी, आंजी (मोठी), डोर्ली, डुर्ला या गावांना नवीन जलवाहिनीद्वारे पाणी कसे देता येईल याचा विचार सध्या प्राकलन तयार करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांकडून केला जात आहे. जलवाहिनी टाकताना विविध ठिकाणी टॅपींग पॉर्इंट तयार करण्यात येणार असून तेथून ही गावे पाण्याची उचल करू शकणार असल्याचे सांगण्यात आले.पूर्वी झाला वर्धा शहरासह नजीकच्या १३ गावांचाच विचारसुरूवातीला वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांना पाणी पुरवठा कसा करता येईल याचा विचार झाला. परंतु, नंतर महाकाळी ते येळाकेळी दरम्यानच्या तब्बल १३ गावांना याच भूमिगत जलवाहिनीद्वारे कसे पाणी देता येईल याचा विचार झाला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्र व्यवहार करण्यात आला. नुकतेच त्या पत्रावर जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उत्तर देण्यात आले आहे.