शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘त्या’ १३ गावांचा होणार विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 21:56 IST

शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या.

ठळक मुद्देप्राकलन तयार होतेय कासवगतीने : महाकाळी ते येळाकेळी भूमिगत जलवाहिनी प्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरासह वर्धा शहरानजीकच्या १३ गावांमधील एकूण ३६ हजार कुटुंबीयांना यंदा भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागले. नागरिकांची समस्या व भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन पाटबंधारे विभागाचे पालक सचिव चहल यांनी वर्धेत घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे पाणी नवीन जलवाहिनी टाकून येळाकेळीपर्यंत आणण्यासाठीचे इस्टिमेट (प्राकलन) म.जी.प्रा.ला तयार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या हे काम कासवगतीने होत असून महाकाळी ते येळाकेळी यादरम्यानच्या १३ गावांनाही पाणी कसे देता येईल, याविषयीचा विचार सध्या केला जात आहे.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची उचल येळाकेळी व पवनार येथून वर्धा न.प. आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. त्यानंतर सदर पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा सुमारे ३६ हजारांच्या वर कुटुंबीयांना केला जातो. परंतु, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने यंदा धाम प्रकल्पातही पुरेसा जलसाठा नव्हता. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांवरून वर्धा पाटबंधारे विभागाने केल्याने नागरिकांनाही पिण्या योग्य पाणी मिळाले. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्याच्या विषयावर १४ मे रोजी पार पडलेल्या बैठकीत पालक सचिव चहल यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राकलन तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मजीप्राने सर्वेक्षण केले. परंतु, प्रकलनाला अंतिम रूप अद्याप देण्यात आलेले नाही.२६ कि.मी. टाकावी लागणार जलवाहिनीमहाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे येळाकेळीपर्यंत आणण्यासाठी २६ किमीची जलवाहिनी टाकावी लागणार असल्याचे सांगण्यात आले.महिना लोटला; अधीक्षकांकडून दखल नाहीमहाकाळी ते येळाकेळीपर्यंत भूमिगत जलवाहिनी टाकून धाम नदीचे पाणी वर्धेपर्यंत आणण्यासाठी प्राकलन तयार करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरच्याच अधीक्षक अभियंत्यांना १६ मे २०१९ ला एक पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले आहे. हे पत्र पाठवून महिना लोटला असून अद्याप वर्धा कार्यालयाला त्यावर उत्तर देण्यात आलेले नाही, हे विशेष.या गावांचा होतोय विचारआर्वी तालुक्यातील काचनूर, खरांगणा, मोरांगणा, कासारखेडा, सावध, सेलू तालुक्यातील खैरी, सुकळी, खेर्डा तर वर्धा तालुक्यातील मजरा, कामठी, आंजी (मोठी), डोर्ली, डुर्ला या गावांना नवीन जलवाहिनीद्वारे पाणी कसे देता येईल याचा विचार सध्या प्राकलन तयार करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाºयांकडून केला जात आहे. जलवाहिनी टाकताना विविध ठिकाणी टॅपींग पॉर्इंट तयार करण्यात येणार असून तेथून ही गावे पाण्याची उचल करू शकणार असल्याचे सांगण्यात आले.पूर्वी झाला वर्धा शहरासह नजीकच्या १३ गावांचाच विचारसुरूवातीला वर्धा शहर आणि शहराशेजारील १३ गावांना पाणी पुरवठा कसा करता येईल याचा विचार झाला. परंतु, नंतर महाकाळी ते येळाकेळी दरम्यानच्या तब्बल १३ गावांना याच भूमिगत जलवाहिनीद्वारे कसे पाणी देता येईल याचा विचार झाला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्र व्यवहार करण्यात आला. नुकतेच त्या पत्रावर जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून उत्तर देण्यात आले आहे.