शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन प्रकल्पात १२.६९ टक्के जलसाठा

By admin | Updated: March 30, 2016 02:24 IST

जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पामध्ये ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे १२.६९ टक्के पाणी उपलब्ध आहे.

आशुतोष सलील : पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावर्धा : जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पामध्ये ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी म्हणजे १२.६९ टक्के पाणी उपलब्ध आहे. उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून जनतेनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिण्याचे पाण्याची संभाव्य टंचाई निर्माण होणाऱ्या गावात ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी दिली. जिल्ह्यातील बोर या मोठ्या सिंचन प्रकल्पात १५.०९ दशलक्ष घनमीटर जलसाठा म्हणजेच १२.१७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. दहा मध्यम प्रकल्पामध्ये ४५.८९ दशलक्ष घनमीटर म्हणजे ११.८८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. धाम प्रकल्पात २४.५४ टक्के, डोंगरगाव १८.७४ टक्के, मदन प्रकल्प ९.५८ टक्के, मदन उन्नई धरण १६.२९ टक्के, लालनाला १०.२० टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प २४.८२ टक्के, निम्न वर्धा ९.५६ टक्के, पोथरा केवळ ०.६९ टक्के व पंचधारा प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध नाही. जिल्ह्यातील २१ लघु प्रकल्पामध्ये आज ६९.९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध असून एकूण उपयुक्त पाणी साठ्याच्या २१.७४ टक्के आहे.(प्रतिनिधी)