शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आगीत १२५ क्विंटल कापूस खाक

By admin | Updated: February 5, 2016 01:40 IST

येथील वर्धा-नागपूर मार्गावरील महावितरणच्या जुन्या कार्यालयजवळ नवलचंद चौधरी यांच्या घराला आग लागली.

सेलू येथील घटना : पाच लाख रुपयांच्या नुकसानीचा अंदाजसेलू : येथील वर्धा-नागपूर मार्गावरील महावितरणच्या जुन्या कार्यालयजवळ नवलचंद चौधरी यांच्या घराला आग लागली. या घरात कोणी वास्तव्यास नसले तरी शेतातील उत्पादन तिथे ठेवल्या जाते. या आगीत घरात ठेवलेला १२५ क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. यात त्यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.एमएसईबी कार्यालय दुसऱ्या नव्या ठिकाणी स्थानांतरित झाल्याने या खाली इमारतीचा गोदाम म्हणून वापर सुरू केला. त्या ठिकाणी कापूस व बाजूच्या खोलीत तुरी भरून ठेवल्या आहेत. अचानक आग लागल्याचे समोरच्या गाळ्यातील दुकानदाराचे लक्षात आले. त्यांनी चौधरी यांना व पोलिसांना सुचित केले. ठाणेदार संतोष बाकल यांनी वर्धा येथे अग्निशमन दलास सुचित करून घटनास्थळ गाठले. तत्पूर्वी शैलेंद्र दप्तरी यांनी आपल्या सीडफार्म वरील अग्निशमन यंत्राचा वापर केला; मात्र आगीपुढे त्याचा फायदा झाला नाही. बाजूच्या रहिवाश्यांनी इमारतीवरुन मोटारपंप लावून पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाची गाडी पोहचताच काही वेळातच आगीवर नियंत्रण आले. यात १२५ क्विंटल कापूस जळाला. तुरीचे पोते ठेवलेल्या खोलीपर्यंत आग पोहचली नाही. त्यामुळे ते बचावले. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली गेली आहे. या ठिकाणी नगराध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ठाणेदार बाकल यांनी स्वत: अग्निशमन गाडीवर चढून अग्निशमन कर्मचाऱ्यास सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)