शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

ओव्हरलोड वाहतुकीतून १.१५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:41 IST

रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे.

ठळक मुद्दे१००७ वाहनांची केली तपासणी : २७४ वाहनांवर जप्तीची कारवाई

प्रशांत हेलोंडे।ऑनलाईन लोकमतवर्धा : रस्त्यांची तथा वाहनांची भार वहन क्षमता ठरलेली असते. क्षमतेपेक्षा अधिक अवजड वाहतूक केल्यास रस्ते तथा वाहने खराब होतात, हे सर्वश्रूत आहे. भार वहन क्षमतेच्या आधारवरच पासिंगही केले जाते; पण बहुतांश वाहन धारक नफ्याच्या नादात क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करतात. अशा वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दहा महिन्यांत तब्बल १ हजार ७ वाहने तपासली. यात १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाद्वारे अवजड वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. यात जानेवारी महिन्यात ८२ वाहने तपासण्यात आलीत. यातील ३१ वाहने दोषी आढळून आली. पैकी २९ प्रकरणे निकाली काढत माल उतरवून ती वहने सोडून देण्यात आली. ८ वाहने आरटीओने जप्त केली आहेत. या एक महिन्याच्या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने स्थानिक तडजोड शुल्क ६ लाख ४६ हजार रुपये व विभागीय तडजोड शुल्क म्हणून २ लाख ७७ हजार रुपये असा ९ लाख २३ हजार रुपये दंड वसूल केला आहे.एप्रिल ते डिसेंबर २०१७ या नऊ महिन्यांच्या कालावधीत क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेणारी ९२५ वाहने आरटीओकडून तपासण्यात आलीत. यात ४०७ वाहने दोषी आढळून आली. ३७३ प्रकरणे निकाली काढत त्यातील माल उतरवून वाहने सोडण्यात आली. यातील २६६ वाहने जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमध्ये स्थानिक तडजोड शुल्क म्हणून आरटीओने ७४ लाख २१ हजार रुपये तर विभागीय तडजोडीपोटी ३१ लाख ९८ हजार रुपये, असा १ कोटी ६ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.दहा महिन्यांच्या कालावधीत तपासणी केलेल्या १ हजार ७ पैकी ४३८ वाहने दोषी आढळून आलीत. यातील ४०२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून माल उतरवून वाहने सोडण्यात आली आहेत. एकूण २७४ वाहने जप्त केली. कारवाईमध्ये १ कोटी १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून देण्यात आली.शहरातून अधिक भारवहन करणाऱ्या जड वाहनांना सूट आश्चर्यकारकराष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तथा जिल्हा मार्गांवर क्षमतेपेक्षा अधिक भार वहन करणाऱ्या जड वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. यातून १.१५ कोटींचा दंडही वसूल करण्यात आला; पण यातून शहरातील जड वाहने वगळली जात असल्याची चर्चा आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांत आहे. यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करतात. वास्तविक, कारवाईमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भार वाहुन नेला जात असेल तर त्या वाहनांवर कारवाई होणे गरजेचे आहे.ओव्हरलोड वाहतुकीबाबत सर्वत्र कारवाई केली जाते. यात बहुतांश वाहने अन्य जिल्हा वा राज्यातील असतात तशी वर्धा जिल्ह्यातीलही असतात. वर्धा शहरातील वाहने ओव्हरलोड वाहतूक करीत असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाते.- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.रस्त्यांचीही होतेय चाळणीक्षमतेपेक्षा अधिक वाहतूक केल्यामुळे वाहनांसह रस्त्यांचीही चाळणी होते. ग्रामीण, शहरी, जिल्हा तथा राज्य मार्गांची भार वहन क्षमता वेगवेगळी असते. ग्रामीण तथा शहरी रस्ते अधिक अवजड वाहतूक सोसू शकत नाही. जिल्हा मार्गही त्या तुलनेत कमकुवतच असतात. असे असले तरी सर्वच मार्गांवर सर्रास ओव्हरलोड वाहतूक केली जाते. यामुळे अनेक रस्त्यांची क्षमता नसल्याने चाळणी होत असल्याचे पाहावयास मिळते.