शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:48 IST

शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी करताना दक्ष राहणे गरजेचे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका व्यक्तीला शासकीय अनुदान देण्यात आले आहे.पिकांवर येणारे विविध रोग आणि किटकांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी उभ्या पिकांवर करतात. सदर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्या अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात येत आहे. फवारणी करणाऱ्यांकडून फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय फवारणी करताना कुठल्याही खाद्यपदार्थ सेवन करणे हे धोक्याचे ठरते. परंतु, अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी किटकनाशकांची फवारणी करताना वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना आणि ६८ शेतमजुरांना अशा एकूण ७६ व्यक्तींना विषबाधा झाली होती. त्यापैकी वडनेर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला जिल्हा प्रशासनाच्यावतीने ४ लाखांचे शासकीय अनुदान देण्यात आले आहे. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांसह शेतमजुरांना किटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी अल्लीपूर येथील एका तरुण व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सेवाग्राम येथील रुग्णालयात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.दोघांना गमवावे लागले प्राणकिटकनाशकांची फवारणी करताना योग्य दक्षता न घेणे हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे याचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला होता. तर यंदाच्या वर्षी याच तालुक्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल प्रभाकर भुसारी (३३) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला मळमळ होणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत असल्यास त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. विषबाधा झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती