शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:48 IST

शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी करताना दक्ष राहणे गरजेचे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका व्यक्तीला शासकीय अनुदान देण्यात आले आहे.पिकांवर येणारे विविध रोग आणि किटकांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी उभ्या पिकांवर करतात. सदर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्या अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात येत आहे. फवारणी करणाऱ्यांकडून फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय फवारणी करताना कुठल्याही खाद्यपदार्थ सेवन करणे हे धोक्याचे ठरते. परंतु, अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी किटकनाशकांची फवारणी करताना वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना आणि ६८ शेतमजुरांना अशा एकूण ७६ व्यक्तींना विषबाधा झाली होती. त्यापैकी वडनेर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला जिल्हा प्रशासनाच्यावतीने ४ लाखांचे शासकीय अनुदान देण्यात आले आहे. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांसह शेतमजुरांना किटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी अल्लीपूर येथील एका तरुण व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सेवाग्राम येथील रुग्णालयात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.दोघांना गमवावे लागले प्राणकिटकनाशकांची फवारणी करताना योग्य दक्षता न घेणे हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे याचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला होता. तर यंदाच्या वर्षी याच तालुक्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल प्रभाकर भुसारी (३३) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला मळमळ होणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत असल्यास त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. विषबाधा झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती