शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जिल्ह्यातील ११० जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:48 IST

शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.

ठळक मुद्देकीटकनाशक फवारणी करताना दक्ष राहणे गरजेचे

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतातील उभ्या पिकांवर किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि दक्षता न घेतल्याने कीटकनाशके फवारणी करताना मागील दोन वर्षांत चक्क ११० व्यक्तींना विषबाधा झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्यापैकी दोन व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून एका व्यक्तीला शासकीय अनुदान देण्यात आले आहे.पिकांवर येणारे विविध रोग आणि किटकांचा नायनाट करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची कृषी केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी उभ्या पिकांवर करतात. सदर किटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्या अशा सूचना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही देण्यात येत आहे. फवारणी करणाऱ्यांकडून फवारणी करताना सेफ्टी किटचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय फवारणी करताना कुठल्याही खाद्यपदार्थ सेवन करणे हे धोक्याचे ठरते. परंतु, अनेकजण त्याकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसून येते. गत वर्षी किटकनाशकांची फवारणी करताना वर्धा जिल्ह्यातील आठ शेतकऱ्यांना आणि ६८ शेतमजुरांना अशा एकूण ७६ व्यक्तींना विषबाधा झाली होती. त्यापैकी वडनेर एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याला जिल्हा प्रशासनाच्यावतीने ४ लाखांचे शासकीय अनुदान देण्यात आले आहे. तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत ३४ शेतकऱ्यांसह शेतमजुरांना किटकनाशके फवारणी करताना विषबाधा झाली. त्यापैकी अल्लीपूर येथील एका तरुण व अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सेवाग्राम येथील रुग्णालयात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.दोघांना गमवावे लागले प्राणकिटकनाशकांची फवारणी करताना योग्य दक्षता न घेणे हा प्रकार जीवावर बेतू शकतो. मागील वर्षी हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील विजय रमेश ठाकरे याचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला होता. तर यंदाच्या वर्षी याच तालुक्यातील अल्लीपूर येथील विठ्ठल प्रभाकर भुसारी (३३) या अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृत्यू शुक्रवारी सकाळी झाला. त्यामुळे किटकनाशके फवारणी करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी योग्य दक्षता घेणे गरजेचे आहे.किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर कुठल्याही व्यक्तीला मळमळ होणे, उलट्या होणे आदी लक्षणे दिसून येत असल्यास त्या व्यक्तीने तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल होत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानेच औषधोपचार घ्यावा. विषबाधा झालेल्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास तो रुग्ण बरा होऊ शकतो.- पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती