शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

ठळक मुद्देगतवर्षीची नैसर्गिक आपत्ती : ८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या २०१९-२० च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे या हंगामात तरी भरपाई मिळणार काय? असा प्रश्न नैसर्गिक आपत्तीग्रस्तांकडून विचारल्या जात आहे.शेतकरी आणि आपत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतरही पावसाचा जोर कायमच होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीटाचा तडाखा कायमच राहिला. परिणामी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी रबी हंगावर आपले लक्ष केंद्रीत करुन मेहनत घेतली. त्यावरही अवकाळी पावसाने दणका दिल्याने पिके जमिनदोस्त झाली. मागील वर्षी जुलै महिन्यापासून तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत जवळपास १५ हजार ५८९ शेतकऱ्यांचे १२ हजार ९३६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेत. जिल्हा प्रशासनाकडून याचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठविला. या सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याकरिता ९ कोटी ८८ लाख ७८ हजार २३८ रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते. वर्षभरात शासनाकडून केवळ १ कोटी ६५ लाख ७६ हजार ५६० रुपये प्राप्त झाले असून ते शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. जुन्या हंगामातील नुकसान भरपाईकरीत नवीन हंगामही उजाडला असून तब्बल ८ कोटी २३ लाख १ हजार ६७६ रुपये शासनाकडून येणे बाकी असल्याने शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.डिसेंबर, जानेवारीत सर्वाधिक नुकसानजिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील ८ हजार ६४० शेतकऱ्यांचे ८ हजार ८०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचाही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन अहवाल सादर केला होता. त्यामुळे ८ हजार ६४० शेतकऱ्यांना ६ कोटी ५२ लाख १६ हजार ८७२ रुपयाची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होती. पण, यातील एक रुपयाचाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.राज्यसह केंद्र सरकारही कोविड-१९ या आपत्तीचा सामना करत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने शासनाने इतर शासकीय कार्यालयात अखर्चित असलेला निधी परत मागितला आहे. त्यामुळे शासनाची अवस्था या काळात बिकट असल्यामुळे ते शेतकऱ्यांना तरी नुकसान भरपाईची मदत देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी