शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही.

ठळक मुद्देगतवर्षीची नैसर्गिक आपत्ती : ८ कोटी २३ लाख रुपयांचा निधी प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावर्षीच्या २०१९-२० च्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांकडून ओरड व्हायला लागल्याने प्रशासकीय यंत्रणेकडून कुठे शेतकऱ्यांच्या बांधावर जावून तर कुठे कार्यालयात बसूनच पंचनामे करीत नुकसानीची आकडेवारी जाहीर केली. त्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविला मात्र, आता जुना हंगाम संपून नवीन हंगाम सुरु झाला तरीही जिल्ह्यातील ११ हजार ८५१ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे या हंगामात तरी भरपाई मिळणार काय? असा प्रश्न नैसर्गिक आपत्तीग्रस्तांकडून विचारल्या जात आहे.शेतकरी आणि आपत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने शेतकऱ्यांना नेहमीच संकटाचा सामना करावा लागतो. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतरही पावसाचा जोर कायमच होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीटाचा तडाखा कायमच राहिला. परिणामी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांनी रबी हंगावर आपले लक्ष केंद्रीत करुन मेहनत घेतली. त्यावरही अवकाळी पावसाने दणका दिल्याने पिके जमिनदोस्त झाली. मागील वर्षी जुलै महिन्यापासून तर यावर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत जवळपास १५ हजार ५८९ शेतकऱ्यांचे १२ हजार ९३६ हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपिटामुळे नुकसान झालेत. जिल्हा प्रशासनाकडून याचे पंचनामे करुन शासनाला अहवाल पाठविला. या सर्व शेतकºयांना नुकसानभरपाई देण्याकरिता ९ कोटी ८८ लाख ७८ हजार २३८ रुपयांची आवश्यकता असल्याचे जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविले होते. वर्षभरात शासनाकडून केवळ १ कोटी ६५ लाख ७६ हजार ५६० रुपये प्राप्त झाले असून ते शेतकऱ्यांच्या खात्यात वळते करण्यात आले. जुन्या हंगामातील नुकसान भरपाईकरीत नवीन हंगामही उजाडला असून तब्बल ८ कोटी २३ लाख १ हजार ६७६ रुपये शासनाकडून येणे बाकी असल्याने शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.डिसेंबर, जानेवारीत सर्वाधिक नुकसानजिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या कालावधीत जिल्ह्यातील ८ हजार ६४० शेतकऱ्यांचे ८ हजार ८०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. याचाही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन अहवाल सादर केला होता. त्यामुळे ८ हजार ६४० शेतकऱ्यांना ६ कोटी ५२ लाख १६ हजार ८७२ रुपयाची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होती. पण, यातील एक रुपयाचाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही, हे दुदैवच म्हणावे लागेल.राज्यसह केंद्र सरकारही कोविड-१९ या आपत्तीचा सामना करत आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत ठणठणाट असल्याने शासनाने इतर शासकीय कार्यालयात अखर्चित असलेला निधी परत मागितला आहे. त्यामुळे शासनाची अवस्था या काळात बिकट असल्यामुळे ते शेतकऱ्यांना तरी नुकसान भरपाईची मदत देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी