वर्धा : मुंबईत बुधवारी रात्री झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शासनाने वर्धा जिल्हा बँकेला १0२ कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. ही मदत भागभांडवल स्वरुपात राहील. त्यामुळे बँकेचे नेटवर्थ सकारात्मक होईल, शिवाय सीआरएआर ४ टक्क्यांवर गेल्याने बँकेला रिझर्व्ह बँकेचा आर्थिक परवाना मिळण्यास काहीच अडचणी येणार नाही.शासनाने घोषित केलेल्या ३१९ कोटींपैकी नागपूर जिल्हा बँकेला ९३ आणि बुलडाणा बँकेला १२४ कोटींची मदत भागभांडवल स्वरुपात राहील. याआधी शासनाने अशा प्रकारची मदत धुळे नंदूरबार बँकेला केली होती. याआधी नागपूर जिल्हा बँकेचे नेटवर्थ ७७.४१ कोटींनी निगेटिव्ह होते. शासनाच्या ९३ कोटींच्या मदतीने हे नेटवर्थ १५.५९ कोटींनी पॉझिटिव्ह होईल. याशिवाय ९.९८ टक्के असलेला सीआरएआर नेटवर्थ पॉझिटिव्ह झाल्याने ३१.१८ कोटींवर जाईल. तो ४ टक्क्यांपेक्षा (३१.१८ कोटी) जास्त असेल. हीच बाब वर्धा जिल्हा बँकेच्या बाबतीतही घडणार आहे. वर्धा बँकेचे नेटवर्थ ९३.७३ कोटींनी निगेटीव्ह होते. ते आता १0३.0८ कोटींनी पॉझिटीव्ह होईल. यामुळे ४ टक्के पर्याप्त भागभांडवलाची गरज पूर्ण होणार असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सर्व अटींची पूर्तता होईल. शिवाय बँकेचे व्यवहार लवकरच नियमित होतील. दोन वर्षांपासून जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असल्यामुळे सुमारे अडीच लाख खातेदारांची आर्थिक कोंडी झालेली होती. थकित वसुली करण्यावर बंधणे आली होती. यामुळे आता आपल्या रकमा मिळणार नाही, अशी भिती खातेदारांमध्ये निर्माण झाली होती. इतकेच नव्हे, तर राजकीय डावपेचाचा भाग म्हणून ही भिती शेतकर्यांसह संपूर्ण खातेदारांमध्ये निर्माण करण्याचे कामही या काळात मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. अखेर शासनाने उशिरा को होईल. विदर्भातील तिन्ही बँकांना भाग भांडवल देऊन विरोधकांची तोंडे बंद केली आहे. यामुळे खातेदारांचा मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेचे माजी अध्यक्ष समीर देशमुख यांनीही या बाबीला दुजोरा दिला.(जिल्हा प्रतिनिधी)
वर्धा जिल्हा बँकेला अखेर १0२ कोटींची मदत
By admin | Updated: June 6, 2014 00:08 IST