शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत १० हजार बचत खाते

By admin | Updated: August 29, 2014 00:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत.

प्रत्येक कुटुंबाचे बचतखाते : जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पासबूक वर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री जन-धन या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ गुरुवारी झाला. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांत सुमारे १० हजारांपेक्षा जास्त बचतखाते उघडण्यात आलेत. बचतखाते उघडलेल्या खातेदारांना बँकेचे पासबुक जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते देण्यात आले.जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांना बँकेच्या सेवा उपलब्ध व्हाव्यात व त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे सुलभ व्हावे त्यादृष्टीने अशा कुटुंबांना प्रथम प्राधान्य द्यावे, तसेच शेवटच्या घटकापर्यंत बँक प्रतिनिधी मार्फत बँकेच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी दिपप्रज्वलीत करून व बचतखाते उघडलेल्या कुटुंबांना बँकेचे पासबुक देवून या योनजेचा शुभारंभ केला. अग्रणी बँकेचे अनंत भिसे यांनी प्रधानमंत्री जन-धन याजनेबद्दल माहिती दिली. अध्यक्षस्थानी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी उदय चौधरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. दादाराव केचे उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक अनंत भिसे व सर्वच बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ व्यवस्थापक व्हि.के. जांगडा यांनी मानले. यावेळी निशिकांत घईसास, आर.आर.जोशी, एन.के.देवपुजारी, वसंत पाठक, स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक वाहीद, लाडे, सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे सील, बँक आॅफ इंडियाचे नायक, नाबार्डच्या डॉ.स्रेहल बन्सोड तसेच राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, जिवन विमा निगमचे निराळे, वर्षा चिंचखेडे आदी उपस्थित होते.प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या पहिल्याच दिवशी बँक आॅफ इंडियातर्फें एक हजार ३५५, स्टेट बँक आॅफ इंडिया तीन हजार ०९६, सेंट्रल बँक एक हजार, आयडीबीआय एक हजार ५० तसेच पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक, एचडीएफसी, बँक आॅफ महाराष्ट्र, विजया बँक, आंध्र बँक आदी बँकांनी १० हजारपेक्षा जास्त बचतखाते उघडून आपला सहभाग दिला.या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाचे झिरो बॅलन्स या तत्वावर बँकखाते उघडण्यात येणार असून, या खात्यांना एक लक्ष रुपयाचा अपघात विमा योजना लागू राहणार आहे. तसेच सहा महिन्यापर्यंत बँकेच्या सुविधांचे लाभ घेतानाच एक हजार रुपये बँकेत जमा करण्यात येतील. त्यावर नियमित व्याज भरणाऱ्या खातेदारांना पाच हजार रुपयांपर्यंत बँकेत व्यवहार करता येतील. बचतखाते, मतदार ओळखपत्र, जॉब कार्ड, आधार कार्ड, अथवा सरपंचाद्वारे दिलेल्या ओळखपत्राद्वारे बँकेत खाते उघडू शकेल. या योजनेमुळे आर्थिक स्वावलंबन व बचत करण्याची सवय जनतेमध्ये निर्माण होईल. दोन हजार लोकसंख्येच्या आत असलेल्या गावांमध्ये बँक प्रतिनिधी मार्फत बचतखाते उघडून सर्व सुविधा घरापर्यंत देण्यात येणार आहे.