शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

By admin | Updated: May 24, 2017 00:41 IST

कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे.

२६८ कृषी पंप मंजूर : १८६ शेतकऱ्यांनी भरली अनामत रक्कम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. याकरिता कोरडवाहू शेती असलेल्या वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी घडक सिंचन योजनेतून विहिरी देण्यात आल्या. यात आलेल्या पाण्याचे सिंचन करता यावे याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप शेतकऱ्यांना अनुदानावर देण्याचा निर्णय झाला. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप सुरू केले असून त्या माध्यमातून त्यांचे सिंचन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या अश्वशक्तीच्या कृषी पंपाला आवश्यक असलेले अनुदान महावितरणकडे भरले आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभरण्यात आले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू असल्याची माहिती आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्याप दूरच असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेत सिंचन करताना शेतकऱ्यांना भरनियमनाचा खोडा पडू नये म्हणून पहिल्या टप्यात ९२० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नसल्याने शेतकऱ्यांकडून याकरिता पाहिजे त्या प्रमाणात अर्ज आले नाही. परिणामी ही योजना रखडली. योजना सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. असे असताना केवळ १०९ शेतकऱ्यांकडेच हे कृषी पंप लागले आहेत. यामुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता तिची आणखी प्रसिद्धी होणे गरजेचे असून याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ८२ शेतकऱ्यांची अर्जानंतर माघार सौर कृषी पंपाकरिता अर्ज करून तो मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ८२ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याकरिता माघार घेतल्याचे दिसून आले आहे. महावितरणकडे या पंपांकरिता तब्बल २६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्या अर्जांची छाणणी करून स्पॉट व्हेरीफिकेशन करून पंप मंजूर करण्यात आले. यातील १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली. मात्र ८२ शेतकऱ्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. अश्वशक्तीनुसार अनामत रकमेत फरक शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप तीन प्रकाराच्या अश्वशक्तीचे आहेत. या योजनेत तीन अश्वशक्तीच्या पंपाकरिता २० हजार, पाच अश्वशक्तीच्या पंपाकरिता २७ हजार आणि साडेसात अश्वशक्तीच्या पंपाकरिता ३६ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. ही रक्कम कमी करावी अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.