शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

१०९ शेतकऱ्यांकडून सौर पंपाने सिंचन

By admin | Updated: May 24, 2017 00:41 IST

कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे.

२६८ कृषी पंप मंजूर : १८६ शेतकऱ्यांनी भरली अनामत रक्कम लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरडवाहू असलेल्या या भागात सिंचनाची सुविधा वाढविण्यावर शासनाकडून भर देण्यात येत आहे. याकरिता कोरडवाहू शेती असलेल्या वर्धा जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापूर्वी घडक सिंचन योजनेतून विहिरी देण्यात आल्या. यात आलेल्या पाण्याचे सिंचन करता यावे याकरिता सौर उर्जेवर चालणारे कृषी पंप शेतकऱ्यांना अनुदानावर देण्याचा निर्णय झाला. या योजनेचा लाभ घेत जिल्ह्यातील १०९ शेतकऱ्यांनी सौर कृषी पंप सुरू केले असून त्या माध्यमातून त्यांचे सिंचन सुरू असल्याची माहिती आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार २६८ सौर कृषी पंप मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी १८६ शेतकऱ्यांनी त्यांनी केलेल्या अश्वशक्तीच्या कृषी पंपाला आवश्यक असलेले अनुदान महावितरणकडे भरले आहे. तर उर्वरीत शेतकऱ्यांकडून ते भरणे अद्याप बाकी आहे. ज्यांनी अनुदान भरले त्यापैकी १०९ शेतकऱ्यांच्या शेतात पंप उभरण्यात आले आहे. त्यांच्याकडून या माध्यमातून ओलीत करणे सुरू असल्याची माहिती आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रारंभी देण्यात आलेल्या उद्दिष्टापासून जिल्हा अद्याप दूरच असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असलेल्या वर्धेत सिंचन करताना शेतकऱ्यांना भरनियमनाचा खोडा पडू नये म्हणून पहिल्या टप्यात ९२० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय झाला होता. मात्र या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्धी झाली नसल्याने शेतकऱ्यांकडून याकरिता पाहिजे त्या प्रमाणात अर्ज आले नाही. परिणामी ही योजना रखडली. योजना सुरू होवून दोन वर्षाचा कालावधी होत आहे. असे असताना केवळ १०९ शेतकऱ्यांकडेच हे कृषी पंप लागले आहेत. यामुळे योजनेचा लाभ घेण्याकरिता तिची आणखी प्रसिद्धी होणे गरजेचे असून याकडे महावितरणने लक्ष देण्याची मागणी होत आहे. ८२ शेतकऱ्यांची अर्जानंतर माघार सौर कृषी पंपाकरिता अर्ज करून तो मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ८२ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याकरिता माघार घेतल्याचे दिसून आले आहे. महावितरणकडे या पंपांकरिता तब्बल २६८ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्या अर्जांची छाणणी करून स्पॉट व्हेरीफिकेशन करून पंप मंजूर करण्यात आले. यातील १८६ शेतकऱ्यांनी आवश्यक अनामत रक्कम भरली. मात्र ८२ शेतकऱ्यांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. अश्वशक्तीनुसार अनामत रकमेत फरक शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप तीन प्रकाराच्या अश्वशक्तीचे आहेत. या योजनेत तीन अश्वशक्तीच्या पंपाकरिता २० हजार, पाच अश्वशक्तीच्या पंपाकरिता २७ हजार आणि साडेसात अश्वशक्तीच्या पंपाकरिता ३६ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागत आहे. ही रक्कम कमी करावी अशी मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.