शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

बापूकुटीला १ लाख ३६ हजार पर्यटकांची भेट

By admin | Updated: April 4, 2016 05:19 IST

जागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या येथील महात्मा गांधी आश्रमला या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ पर्यटकांनी भेट

दिलीप चव्हाण ल्ल सेवाग्रामजागतिक स्तरावरील प्रसिद्ध असलेल्या येथील महात्मा गांधी आश्रमला या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद येथील अभिप्राय पुस्तिकेत झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक पर्यटक येथे नोंद न करता भेट देवून गेल्यचेही वास्तव आहे. सत्य आणि अहिंसा या तत्वांने महात्मा गांधी यांनी देशाला दिशा दिली. त्यांच्या याच तत्वाची आज पुन्हा विश्वाला गरज असल्याच्या प्रतिक्रीया येथे येणाऱ्या अभ्यासकांसह पर्यटकांनी दिल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतात महात्मा गांधी यांनी वेगवेगळे सत्याग्रह केले. स्वातंत्र्य आणि रचनात्मक कार्यक्रमाची दिशा याच सेवाग्राम आश्रमातून ठरविल्या गेली. गांधीजीचे दहा वर्षांचे वास्तव्य सेवाग्राम आश्रमात होते. यामुळे या आश्रमाचे महत्त्व काही औरच आहे. यामुळे आश्रमातून झालेली कामे आणि बैठकांची माहिती येथील साधकांकडून पर्यटक घेताना दिसतात. सदर आश्रम राष्ट्रीय धरोहर असल्याने वास्तू व वातावरण प्रेरणादायी आहे. आश्रम व स्मारक प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि तो नवीन पिढीने पाहावा या उद्देशाने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षाला वाढत आहे. एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षात १ लाख ३६ हजार १३ इतकी संख्या नोंदविण्यात आलेली आहे. यात सर्वात कमी नोंद गत मे महिन्यात झाली. ही नोंद ६ हजार २७० होती. सर्वात जास्त नोंद जानेवारी महिन्यात झाली. ती २१ हजार २७१ इतकी आहे. विदेशी अभ्यासकांची गर्दी ४महात्मा गांधी एक व्यक्ती नसून ते विचार आहे. आणि विचार प्रत्येकालाच हवे असतात, हे येथे येणाऱ्या विदेशी अभ्यासकांच्या गर्दीने दिसून आले आहे. आश्रमात महात्मा गांधी यांच्या विचाराची शिदोरी नेण्याकरिता येथे अनेक जण येऊन गेल्याची नोंद झाली आहे. तर अनेक आंदोलनाची सुरुवात याच आश्रमाच्या भूमीतून झाल्याची नोंदही यंदाच्या वर्षात झाली.