शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

सेलू शहरालगतच्या शेतीला एकरी एक कोटीचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:23 IST

महामार्गामुळे भाव कडाडले: ले-आऊटमधील भूखंड घेणेही आवाक्याबाहेर

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शहराला लागूनच तुळजापूर- नागपूर महामार्ग व थोड्याच अंतरावरून समृद्धी महामार्ग गेल्याने सेलू शहराच्या वैभवात भर पडली आहे. शहरालगतच्या शेतीचे भाव आकाशाला भिडले असून प्रतिएकरी जवळपास एक कोटी रुपयांचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे येथील शेतीला आणि शेतकऱ्यांनाही 'अच्छे दिन' आलेले दिसून येत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी ८० ते ८५ लाख रुपये एकरप्रमाणे काही व्यवहारही झालेले आहेत. शहरालगत विकाऊ शेती कमी असल्याने महामार्गालगतच्या शेतीचे भाव चांगलाच भाव खाऊ लागले आहे. सेलू शहराच्या आजूबाजूला सर्व प्रमुख मार्गांनी ले-आऊट टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात कृषक जमीन व कृषक करून प्लॉट विक्री ही सुरू आहे. शहराच्या परिसरात ले-आऊट पडल्याने आता मूळ वस्तीपासून दूरपर्यंत सेलू शहर विस्तारत आहेत.

कोणत्या भागात एकरी काय दर?नागपूर-तुळजापूर मार्गावर : नागपूर-तुळजापूर महामार्गावर शेतीचे भाव चांगले कडाडले आहे. सेलू शहरालगत एक कोटी रुपये प्रतिएकर भाव आहे. थोडे दूर गेले तर ७५ लाखांपर्यंत प्रतिएकर जमीन विकल्या जात आहेत.

सेलू-सुकळी स्टेशन मार्ग : सेलू शहर ते सुकळी स्टेशन मार्गाला क्रॉस करून समृद्धी महामार्गहीँ गेला आहे. या रस्त्याने एमआयडीसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंगणा, हिंगणी, सेलू मार्गे मदनी असा महामार्ग विकसित झाल्याने या रस्त्यावर एक कोटी रुपये भाव जमिनीला मिळत आहे

सेलू-वडगाव मार्ग : या मार्गावर सेलू शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ले-आऊट विकसित झाले आहे. तसेच सेलू-रेहकी मार्गही चांगलाच भाव खात असून ६० ते ८० लाख रुपये एकर जमीन विकल्या जात आहे. मात्र, प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडी कमी आहे. 

व्यावसायिकांत स्पर्धाशहराला लागून समृद्धी माहमार्ग गेला. नागपूर-तुळजापूर महामार्गही विकसित आल्याने जमिनीचे दर वाढले आहेत. आजूबाजूच्या गावांतही जमिनींचे दर वाढले असून ले-आऊट विकसित करून विकणाऱ्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे.

व्यावसायिकांच्या खिळल्या नजरा... तालुक्यात बोरधरण व बोरव्याघ्र प्रकल्प आहे. तेथे पर्यटकांची गर्दी असते. जंगल सफारीसाठी दूरवरून प पर्यटक येथे येतात. यामुळे हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट वाढले आहेत. व्यावसायिक लोकांच्या नजरा येथील वाढत्या पर्यटनाकडे लागल्याने जमिनीचे दर येथेही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरात ले-आऊटही वाढले आहेत.

माजी सरपंच काय म्हणतात..."तालुक्यातून समृद्धी महामार्ग, नागपूर-तुळजापूर महामार्ग गेल्याने जमिनी अधिग्रहित केल्या. त्यामुळे या परिसरातील जमिनींना मोठे महत्त्व आल्याने जमिनीचा भाव एक कोटीवर गेला आहे."- जयश्री शंकदवार, माजी सरपंच, धानोली (मेघे).

"तालुका सिंचनात सुजलाम् सुफलाम् आहे. पूर्वीच जमिनीचे दर जास्त होते. तुळजापूर-नागपूर महामार्गाचे नूतनीकरण व समृद्धी महामार्ग गेल्याने भाव आकाशाला भिडले." - पिंटू सोमनाथे, माजी सरपंच

टॅग्स :wardha-acवर्धा