शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

सेलू शहरालगतच्या शेतीला एकरी एक कोटीचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:23 IST

महामार्गामुळे भाव कडाडले: ले-आऊटमधील भूखंड घेणेही आवाक्याबाहेर

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : शहराला लागूनच तुळजापूर- नागपूर महामार्ग व थोड्याच अंतरावरून समृद्धी महामार्ग गेल्याने सेलू शहराच्या वैभवात भर पडली आहे. शहरालगतच्या शेतीचे भाव आकाशाला भिडले असून प्रतिएकरी जवळपास एक कोटी रुपयांचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे येथील शेतीला आणि शेतकऱ्यांनाही 'अच्छे दिन' आलेले दिसून येत आहे.

मागील दोन वर्षांपूर्वी ८० ते ८५ लाख रुपये एकरप्रमाणे काही व्यवहारही झालेले आहेत. शहरालगत विकाऊ शेती कमी असल्याने महामार्गालगतच्या शेतीचे भाव चांगलाच भाव खाऊ लागले आहे. सेलू शहराच्या आजूबाजूला सर्व प्रमुख मार्गांनी ले-आऊट टाकण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात कृषक जमीन व कृषक करून प्लॉट विक्री ही सुरू आहे. शहराच्या परिसरात ले-आऊट पडल्याने आता मूळ वस्तीपासून दूरपर्यंत सेलू शहर विस्तारत आहेत.

कोणत्या भागात एकरी काय दर?नागपूर-तुळजापूर मार्गावर : नागपूर-तुळजापूर महामार्गावर शेतीचे भाव चांगले कडाडले आहे. सेलू शहरालगत एक कोटी रुपये प्रतिएकर भाव आहे. थोडे दूर गेले तर ७५ लाखांपर्यंत प्रतिएकर जमीन विकल्या जात आहेत.

सेलू-सुकळी स्टेशन मार्ग : सेलू शहर ते सुकळी स्टेशन मार्गाला क्रॉस करून समृद्धी महामार्गहीँ गेला आहे. या रस्त्याने एमआयडीसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिंगणा, हिंगणी, सेलू मार्गे मदनी असा महामार्ग विकसित झाल्याने या रस्त्यावर एक कोटी रुपये भाव जमिनीला मिळत आहे

सेलू-वडगाव मार्ग : या मार्गावर सेलू शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ले-आऊट विकसित झाले आहे. तसेच सेलू-रेहकी मार्गही चांगलाच भाव खात असून ६० ते ८० लाख रुपये एकर जमीन विकल्या जात आहे. मात्र, प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांची संख्या थोडी कमी आहे. 

व्यावसायिकांत स्पर्धाशहराला लागून समृद्धी माहमार्ग गेला. नागपूर-तुळजापूर महामार्गही विकसित आल्याने जमिनीचे दर वाढले आहेत. आजूबाजूच्या गावांतही जमिनींचे दर वाढले असून ले-आऊट विकसित करून विकणाऱ्यांची स्पर्धा निर्माण झाली आहे.

व्यावसायिकांच्या खिळल्या नजरा... तालुक्यात बोरधरण व बोरव्याघ्र प्रकल्प आहे. तेथे पर्यटकांची गर्दी असते. जंगल सफारीसाठी दूरवरून प पर्यटक येथे येतात. यामुळे हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट वाढले आहेत. व्यावसायिक लोकांच्या नजरा येथील वाढत्या पर्यटनाकडे लागल्याने जमिनीचे दर येथेही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या परिसरात ले-आऊटही वाढले आहेत.

माजी सरपंच काय म्हणतात..."तालुक्यातून समृद्धी महामार्ग, नागपूर-तुळजापूर महामार्ग गेल्याने जमिनी अधिग्रहित केल्या. त्यामुळे या परिसरातील जमिनींना मोठे महत्त्व आल्याने जमिनीचा भाव एक कोटीवर गेला आहे."- जयश्री शंकदवार, माजी सरपंच, धानोली (मेघे).

"तालुका सिंचनात सुजलाम् सुफलाम् आहे. पूर्वीच जमिनीचे दर जास्त होते. तुळजापूर-नागपूर महामार्गाचे नूतनीकरण व समृद्धी महामार्ग गेल्याने भाव आकाशाला भिडले." - पिंटू सोमनाथे, माजी सरपंच

टॅग्स :wardha-acवर्धा