शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आता बस करा; आमची मात्र जिरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांनी ‘येरे... येरे... पावसा’ अशी गळ घालत गावागावात धोंडी काढली होती. ‘धोंडी... धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे...’ अशी विनवणी करीत पंगतीही उठविण्यात आल्या. पण, आता गेल्या आठवड्यापासून या पावसाने चांगलाच कहर केल्याने आता ‘जारे... जारे... पावसा’ म्हणण्याची वेळ आली. सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे.जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. अजूनही हवामान खात्याच्या वतीने अतिपावसाची शक्यता वर्तविली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाण्याचीही पातळी वाढली असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे ६० सेंमीने तर लाल नाला प्रकल्पाचे २ दरवाजे ५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिकडे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अद्यापही आकाशात ढगांची गर्दी कायम असल्याने आता हा पाऊस अनेकांना नकोसा झाला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेत शिवारातील पाण्यामुळे पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस