शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

आता बस करा; आमची मात्र जिरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे. जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांनी ‘येरे... येरे... पावसा’ अशी गळ घालत गावागावात धोंडी काढली होती. ‘धोंडी... धोंडी पाणी दे, धान कोंडा पिकू दे...’ अशी विनवणी करीत पंगतीही उठविण्यात आल्या. पण, आता गेल्या आठवड्यापासून या पावसाने चांगलाच कहर केल्याने आता ‘जारे... जारे... पावसा’ म्हणण्याची वेळ आली. सर्व शेतशिवार जलमय होऊन घराघरांतही पाणी शिरले. त्यामुळे सोशल मीडियावरही या अतिपावसाबद्दल वेगवेगळे संदेश व्हायरल व्हायला लागले आहेत. त्यात ‘आता बस करा, जमिनीत पाणी जिरलं का नाही, ते माहीत नाही, पण आमची मात्र जिरली’ असा फलक असलेला संदेश चांगलाच व्हायरल होत आहे.जिल्ह्यात सर्वदूर कोसळधार झाल्याने अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. अजूनही हवामान खात्याच्या वतीने अतिपावसाची शक्यता वर्तविली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पातील पाण्याचीही पातळी वाढली असून निम्न वर्धा प्रकल्पाचे ११ दरवाजे ६० सेंमीने तर लाल नाला प्रकल्पाचे २ दरवाजे ५ सेंमीने उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तिकडे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर अमरावती जिल्ह्यात असलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातूनही पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अद्यापही आकाशात ढगांची गर्दी कायम असल्याने आता हा पाऊस अनेकांना नकोसा झाला आहे. या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने शेत शिवारातील पाण्यामुळे पिके हातून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून ओला दुष्काळ जाहीर करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस