शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

अखेर ईस्माइलपूरचा वाळूघाट केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा कारवाई : हद्द सोडून चालविला होता अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर घाट धारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसघोरी चालविली होती. यासंदर्भात आष्टी तहसीलदारांकडेही तक्रार करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही तहसीलदाराने अहवाल पाठविल्यानंतरही कारवाई होत नसल्याने लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत करण्यात आला.आष्टी तालुक्याच्या वर्धा नदी पात्रात ईस्माइलपूर वाळूघाट असून या नदीपात्राचा निम्मे भाग वर्धा तर निम्मे भाग अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत येतो. यावर्षी प्रारंभी झालेल्या आठ वाळू घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माइलपूर घाटाचाही लिलाव करण्यात आला. हा लिलाव पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरचे संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला होता. घाटाचा ताबा मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतूनच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना घाटधारकांने अमरावती जिल्ह्यात घुसघोरी चालविली होती. त्याने अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील फत्तेपूर (जावरा) या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला होता.त्यामुळे याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.यासंदर्भात लोकमते वृत्त प्रकाशित करुन हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी फाईलवरची धुळ झटकून कार्यवाहीला गती देत अवघ्य आठ दिवसात घाट रद्दचा आदेश पारीत केला. या आदेशामुळे घाटधारकांला मुदत संपण्यापूर्वीच आपला घाट बंद करावा लागला.सप्टेंबर अखेर वाळूघाटावर बंदीपहिल्या टप्प्यातील आठ वाळू घाटांपैकी ईस्माइलपूर घाट वगळता सर्व घाटांना एप्रिल महिन्यात ताबा दिल्याने जूलै महिन्यातच त्यांची मुदत संपली. विशेषत: यातील शिवणी व धोची घाटही घाटधारकांच्या उपद्रवामुळे मुदतीपूर्वीच रद्द करावा लागला. तर ईस्माइलपूर घाटाला सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असताना तोही घाट मुदतीपूर्वीच रद्द करण्यात आला. सध्या दुसºया टप्प्यातील हिवरा (कावरे) व भगवा या घाटातूनच स्पटेंबर अखेरपर्यंत उपसा करता येणार आहे.दहा घाटांचा झाला होता लिलावजिल्ह्यात यावर्षी दोन टप्प्यात घाटांचा लिलाव करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव(रिठ),नांदगाव(बोरगाव)-२, पारडी (नगाजी) व धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव अशा आठ घाटांचा लिलाव करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात आठ घाटांपैकी दोनच घाटांचा लिलाव झाला. यामध्ये देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे) व हिंगणघाट तालुक्यातील भगवा या वाळूघाटांचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू