शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

अखेर ईस्माइलपूरचा वाळूघाट केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा कारवाई : हद्द सोडून चालविला होता अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर घाट धारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसघोरी चालविली होती. यासंदर्भात आष्टी तहसीलदारांकडेही तक्रार करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही तहसीलदाराने अहवाल पाठविल्यानंतरही कारवाई होत नसल्याने लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत करण्यात आला.आष्टी तालुक्याच्या वर्धा नदी पात्रात ईस्माइलपूर वाळूघाट असून या नदीपात्राचा निम्मे भाग वर्धा तर निम्मे भाग अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत येतो. यावर्षी प्रारंभी झालेल्या आठ वाळू घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माइलपूर घाटाचाही लिलाव करण्यात आला. हा लिलाव पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरचे संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला होता. घाटाचा ताबा मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतूनच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना घाटधारकांने अमरावती जिल्ह्यात घुसघोरी चालविली होती. त्याने अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील फत्तेपूर (जावरा) या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला होता.त्यामुळे याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.यासंदर्भात लोकमते वृत्त प्रकाशित करुन हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी फाईलवरची धुळ झटकून कार्यवाहीला गती देत अवघ्य आठ दिवसात घाट रद्दचा आदेश पारीत केला. या आदेशामुळे घाटधारकांला मुदत संपण्यापूर्वीच आपला घाट बंद करावा लागला.सप्टेंबर अखेर वाळूघाटावर बंदीपहिल्या टप्प्यातील आठ वाळू घाटांपैकी ईस्माइलपूर घाट वगळता सर्व घाटांना एप्रिल महिन्यात ताबा दिल्याने जूलै महिन्यातच त्यांची मुदत संपली. विशेषत: यातील शिवणी व धोची घाटही घाटधारकांच्या उपद्रवामुळे मुदतीपूर्वीच रद्द करावा लागला. तर ईस्माइलपूर घाटाला सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असताना तोही घाट मुदतीपूर्वीच रद्द करण्यात आला. सध्या दुसºया टप्प्यातील हिवरा (कावरे) व भगवा या घाटातूनच स्पटेंबर अखेरपर्यंत उपसा करता येणार आहे.दहा घाटांचा झाला होता लिलावजिल्ह्यात यावर्षी दोन टप्प्यात घाटांचा लिलाव करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव(रिठ),नांदगाव(बोरगाव)-२, पारडी (नगाजी) व धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव अशा आठ घाटांचा लिलाव करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात आठ घाटांपैकी दोनच घाटांचा लिलाव झाला. यामध्ये देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे) व हिंगणघाट तालुक्यातील भगवा या वाळूघाटांचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू