शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखेर ईस्माइलपूरचा वाळूघाट केला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा कारवाई : हद्द सोडून चालविला होता अवैध उपसा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर घाट धारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसघोरी चालविली होती. यासंदर्भात आष्टी तहसीलदारांकडेही तक्रार करण्यात आली होती. याबाबत जिल्हा प्रशासनाकडेही तहसीलदाराने अहवाल पाठविल्यानंतरही कारवाई होत नसल्याने लोकमतने याप्रकरणी वृत्त प्रकाशित करताच अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने हा घाट रद्द करण्याचा आदेश पारीत करण्यात आला.आष्टी तालुक्याच्या वर्धा नदी पात्रात ईस्माइलपूर वाळूघाट असून या नदीपात्राचा निम्मे भाग वर्धा तर निम्मे भाग अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत येतो. यावर्षी प्रारंभी झालेल्या आठ वाळू घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माइलपूर घाटाचाही लिलाव करण्यात आला. हा लिलाव पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरचे संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला होता. घाटाचा ताबा मिळाल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतूनच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना घाटधारकांने अमरावती जिल्ह्यात घुसघोरी चालविली होती. त्याने अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील फत्तेपूर (जावरा) या घाटातून अवैधरित्या वाळू उपसा सुरु केला होता.त्यामुळे याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आष्टीच्या तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे आष्टीच्या तहसीलदारांनी चौकशी करुन घाट रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु, या कार्यालयात हा अहवाल तसाच धुळखात पडल्याने घाटधारकांची हिंम्मत चांगलीच वाढली होती.यासंदर्भात लोकमते वृत्त प्रकाशित करुन हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱ्यांनी फाईलवरची धुळ झटकून कार्यवाहीला गती देत अवघ्य आठ दिवसात घाट रद्दचा आदेश पारीत केला. या आदेशामुळे घाटधारकांला मुदत संपण्यापूर्वीच आपला घाट बंद करावा लागला.सप्टेंबर अखेर वाळूघाटावर बंदीपहिल्या टप्प्यातील आठ वाळू घाटांपैकी ईस्माइलपूर घाट वगळता सर्व घाटांना एप्रिल महिन्यात ताबा दिल्याने जूलै महिन्यातच त्यांची मुदत संपली. विशेषत: यातील शिवणी व धोची घाटही घाटधारकांच्या उपद्रवामुळे मुदतीपूर्वीच रद्द करावा लागला. तर ईस्माइलपूर घाटाला सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असताना तोही घाट मुदतीपूर्वीच रद्द करण्यात आला. सध्या दुसºया टप्प्यातील हिवरा (कावरे) व भगवा या घाटातूनच स्पटेंबर अखेरपर्यंत उपसा करता येणार आहे.दहा घाटांचा झाला होता लिलावजिल्ह्यात यावर्षी दोन टप्प्यात घाटांचा लिलाव करण्यात आला. पहिल्या टप्प्यात आष्टी तालुक्यातील ईस्माइलपूर, हिंगणघाट तालुक्यातील सोनेगाव(रिठ),नांदगाव(बोरगाव)-२, पारडी (नगाजी) व धोची तर समुद्रपूर तालुक्यातील शिवणी-१, शिवणी-२ व मांडगाव अशा आठ घाटांचा लिलाव करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात आठ घाटांपैकी दोनच घाटांचा लिलाव झाला. यामध्ये देवळी तालुक्यातील हिवरा (कावरे) व हिंगणघाट तालुक्यातील भगवा या वाळूघाटांचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू